Thursday, July 28, 2011

एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे.

वर्ल्ड कल्चर फेस्टिवल मधील श्री श्री रवि शंकर यांच्या भाषणातील काही अंश 

जिथे लोकांमधील भिंती नाहीशा झाल्या अशा या शहरात येऊन मला खूप आनंद होत आहे, आता विविध सभ्यता आणि संस्कृतींमधील भिंती नाहीशा होण्याची वेळ आली आहे.  आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपल सगळ "जग एक कुटुंब आहे".  आपण सगळ्यांना प्रेम, दया आणि सेवेच्या भावनेमध्ये एकत्र आणले पाहिजे. 

आम्ही जेंव्हा सुरुवात केली, आमची एक कल्पना होती, आजच्या कार्यक्रमाचा विषय 'इंद्रधनुष्याचे रंग' असेल आणि पाऊस आला आहे! कठीण परिस्थितींमध्ये गाणे हेच दाखवते, की आपण काहीतरी मिळवले आहे. 

परिस्थिती कशीही असो, एक कुटुंब बनुन आम्ही जगाची सेवा करणे चालूच ठेवू, . विविधता आणि या ग्रहावरील जीवन यांचा उत्सव साजरा करायची ही वेळ आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व स्वयंसेवकांच्या मदतीने, आमच्या मुलांसाठी तणाव-मुक्त, हिंसाचार मुक्त समाज घडवू शकतो. दारिद्र्य नसलेला, विविधतांचा उत्सव करणार आणि देवत्वाशी जोडलेला.' एक देवत्व, एक माणुसकी, विविधतेचा उत्सव, हेच आपले पवित्र कर्म आहे. '

हे जाणून घ्या की एक शक्ती आहे जी सगळ्यांची काळजी घेत आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते.

प्रश्न: प्रिय गुरुजी, सर्व भितींवर विजय कसा मिळवावा आणि जर यश मिळाले तर या अनुभवातून काय अपेक्षा ठेवावी?
श्री श्री रवी शंकर: "सगळ्या" भीती असे काहीही नाही. फक्त एकच भीती असते आणि ती नष्ट होण्याची भीती आहे आणि निसर्गानेच ती भीती ठेवली आहे.  आणि ती नष्ट कशी होईल तर हे समजून घेण्याने की 'मी शरीर नाही, मी आत्मा आहे. '  पहिली गोष्ट. दुसरी 'माझ्याबरोबर सगळे चांगलेच होईल' एव्हडेच. तिसरे नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्ही खूप वेळा स्वप्नात येता  आणि उत्तरे देऊन अध्यात्मिक मार्गदर्शन पण केले आहे.  हे खरे आहे का, मी यावर विश्वास ठेवू का?
श्री श्री रवी शंकर: जेंव्हा सगळे चांगले होत असेल तर..... पण गोष्टी चुकीच्या होत असतील तेंव्हा तुमचे स्वतःचे मन असते! (हशा)  हे पहा, जर तुम्हाला विचार आला, आणि तो बरोबर ठरला तर "मला अंतर्ज्ञान झाले असे म्हणता.  जर ते सत्य परिस्थितीबरोबर जुळले नाही तर तुम्ही त्याला "मला अंतर्ज्ञान झाले" असे म्हणत नाही'.तुम्ही कसे म्हणता? "मला भास झाला". भास आणि अंतर्ज्ञान यातला फरकच हा आहे की भास बरोबर नसतो.

प्रश्न: महत्वाचे काय आहे, आनंद की कर्तव्य?
श्री श्री रवी शंकर : दोन्ही.  तुम्ही तुमचे कर्तव्य केले पाहिजे आणि आनंदी पण राहिले पाहिजे. तूम्हाला दोन्हीमधला पर्याय का हवा आहे? हं....जर पर्याय असेल तर कर्तव्य आधी करा, तुम्ही आनंदी नसला तरी ते तात्पुरते असेल. ..बरोबर?  आनंद तर आहेच, तो येईल. पण जर तुम्ही कर्तव्यापेक्षा आनंदाला निवडले तर शेवटी तुम्हीच दु:खी  व्हाल.  सुरुवातीला थोडे दु:खी राहणे हे नंतर कायम दु:खी राहण्यापेक्षा कधीही चांगले.

प्रश्न: गुरुजी, कृपया कर्मांचे नियम सांगा, मी शारीरिक त्रासांपासून कसा मुक्त होऊ आणि निःस्वार्थी सेवा कशी करू? माझा शारीरिक आजारांमुळे मी कार्यरत, प्रेमळ आणि आनंदी राहू शकत नाही. मी लौकर दमतो. कृपया मार्गदर्शन करा. खुप सारे प्रेम.
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, त्याची काळजी करू नका हे सर्वोत्तम आहे. कळले? कर्म फक्त मनात असते, तरी तुम्ही शारीरिक आजारांबद्दल काळजी करता "अरे ही माझी कर्मे आहेत....." पहा, शरीराची त्याची मर्यादा आहे. प्रत्येकाच्या शरीराला मर्यादा आहेत. आपण निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्याचे तोटे सहन करायलाच लागणार आहे.  ठीक  आहे?  तुमचे  मन मजबूत ठेवा, आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला परमानंद कधी आणि केंव्हा मिळेल?
श्री श्री रवी शंकर: काही शक्यता नाही (हशा) . नाही. विसरून जा. तुम्ही विसरून जायला तयार आहात का? मग तुम्हाला आत्ता कळेल. तुमचे मन " परमानंदाबद्दल, मला एक दिवस परमानंद मिळवायचा  आहे....." याबद्दल चिंतीत आहे.

प्रश्न: माझ्या हृदयाला पुढे जायचे आहे पण मन जाऊ देत नाही, मी काय करू गुरुजी? आभारी आहे.
श्री श्री रवी शंकर त्यांचे सतत भांडण होतच असते. जसे वृद्ध जोडपे सारखे भांडत असते (हशा)

प्रश्न: मी अशा चुका केल्या आहेत की त्याचा परिणाम इतरांवर पडला आहे अशा परिस्थितीत मला शांतता कशी मिळेल?
श्री श्री रवी शंकर: तुम्ही योग्य जागी पोहोचला आहात.

प्रश्न: प्रिय गुरुजी, नमस्कार. मोठे बक्षीस मिळवण्याच्या इच्छेने लॉटरीचे तिकीट घेतले तर चालेल का? (हशा) की ते पैसे घेणे चांगले नाही. कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री रवी शंकर: काहीच बोलायचे नाही. मला तुमच्या मनात दुसरे द्वंद्व निर्माण करायचे नाही.

प्रश्न: गुरु पौर्णिमेची इच्छा म्हणून मी लॉटरीचे बक्षीस मागू शकतो का?
श्री श्री रवी शंकर: मन किती गमतीदार वागते! फार काही न करता लॉटरी हवी आहे. छान छान छान छान.

प्रश्न: जय गुरु देव गुरुजी, कृपया मला माफ करा.
श्री श्री रवी शंकर: केले.

प्रश्न: प्रिय गुरुजी, पतंजली म्हणतात की योग तुम्हाला मुक्ती देऊ शकतो. आदिशंकर म्हणतात की फक्त ज्ञानच मुक्ती देऊ शकते. कृपया समजावून सांगा.
श्री श्री रवी शंकर: आणि तुम्ही विसरलात की भक्ती सूत्र सांगते की फक्त समर्पणच मुक्ती देऊ शकते! जोडले जाणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. विचाराने बुद्धी शुद्ध होते. तुम्ही जर बुद्धीजीवी असाल तर बुद्धी हेच परम आनंदात राहण्यापासून दूर ठेवते. मन मध्ये येते आणि प्रश्न विचारात राहते, शंका घेत राहते.
ज्ञानातून बुद्धी शुद्ध होते.
योगाने शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो.
प्रेम/समर्पणाने हृदय शुद्ध होते.

तुम्ही एक रस्ता निवडला तर बाकीचे दोन रस्ते बरोबर येतात.  ते होईल, ते होते. योग म्हणजे एकत्र येणे आणि एक होणे आणि जर तुम्ही हृदयःचा मार्गाने गेलात, नक्कीच आपोआप एकी होईल आणि जेंव्हा एकत्र येणे होते तेंव्हा ज्ञान येते.ज्ञान मार्गाने जा - जोपर्यंत ज्ञान प्राप्तीचा उत्साह नसेल तोपर्यंत ज्ञानात कसे जाणार?  उत्साहाचा पाया प्रेम आहे. तर, ज्ञानामध्ये प्रेम पण आहे. जर ज्ञानाबद्दल प्रेम नसेल तर त्यासाठी उत्साह पण येणार नाही. म्हणून तुम्ही जरी ज्ञान मार्गाने गेलात तरी तिथे प्रेम आहेच, फक्त लपलेले आहे. आते बरोबर येते आणि फुलते.  जेव्हडे जास्त तुम्हाला माहिती होईल तेवढे जास्त तुम्ही त्यावर प्रेम कराल, तेवढे जास्त तुम्हाला ते आवडेल. हे एक रहस्य आहे. हं?  इंग्रजी म्हण आहे ' अतिपरिचयात अवज्ञा' ठी अतिसाय उथळ आहे. तुमचा तेवढा परिचय होईल, तेवढे जास्त प्रेम त्यात तुमच्यासाठी फुलेल. बरोबर? म्हणून, तुम्ही ज्ञानातून जा अथवा प्रेमातून जा अथवा योगामधून जा. योगामध्ये कर्म योग, कृत्य पण येते. योग म्हणजे एकत्रित येणे. बाकीचे दोन बरोबर येतात.

प्रश्न: तुमचे ज्याचावर प्रेम आहे आणि ते विरोध करत असतील तरी त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे? मी प्रयत्न करत राहतो पण त्याचा की उपयोग होताना दिसत नाही.
श्री श्री रवी शंकर : प्रयत्न सोडू नका.  तुमच्या सर्व युक्त्या वापरा. प्रश्न असा आहे की जर कोणी विरोध करत असेल तर त्यांना अध्यात्मिक मार्गावर कसे आणावे. मी म्हणेन, प्रयत्न करत राहा, परत प्रयत्न करा आणि करत राहा. जर ते हट्टीपणा करत असतील तर तुम्ही जास्त हट्टी व्हा.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही कोण आहात आणि काय आहात यावर मला शंका घ्यायची नाही पण तरीसुद्धा शंका आहे. मी काय करावे?
श्री श्री रवी शंकर: काही हरकत नाही, तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे जास्त शंका घ्या. तुम्ही शंका घेण्याला माझी काही हरकत नाही. जाणून घ्या की आपण ज्याचावर शंका घेतो ते नेहमी चांगले असते. आपण प्रेमावर शंका घेतो, रागावर नाही. आपण आपला क्षमतांवर शंका घेतो, आपला कमतरतांवर नाही. आपण आपल्या आनंदावर शंका घेतो. आपला शंकांचा स्वभाव जाणून घ्या.

प्रश्न: गुरुजी, आडमुठ्या लोकांचा राग निघून जाण्यासाठी, ज्यांना अध्यात्मिक मार्गावर यायचे नाही त्यांना कशी मदत करावी?
श्री श्री रवी शंकर: तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य द्या. तुम्ही कोणावर ताबा ठेवू शकत नाही. ही व्यक्ती अशीच आहे, तुम्ही त्यांचे काय कराल? आपल्या काही कुणाला काही सांगण्याने ते बदलणार नाही आणि तुम्ही कुणावर ताबाही ठेवू नये.  माझा निष्कर्ष हा आहे, काय? कुणावरही ताबा ठेवू नका. त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ द्यात.  त्यांनी ऐकले तर फक्त त्यांना मार्गदर्शन करा, तसेही हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काय करू शकता?

तुम्हाला मी काय सांगतोय ते समजत आहे का? तुम्ही त्यांच्यावर ताबा ठेवायचा प्रयत्न करा - तुमची मुले, पती-पत्नी आणि मित्र - कुठलाही हेतू न ठेवता;  तुमचे त्यांना ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात काहीच वाईट हेतू नाही. पण ते जेंव्हा रागावतील तेंव्हा तुम्ही काय करू शकता?  तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ताबा ठेवण्याच्या प्रयत्नामुळे तुम्हाला राग येतो.  ज्या क्षणी तुम्ही ताबा ठेवणे थांबवलं , त्या क्षणी तुमचा राग नाहीसा होईल, कळले? हं?  जेंव्हा कोणी तुमचे ऐकत नाही तेंव्हा तुमची चीड चीड होते, बरोबर? तुम्ही त्यांना दहा वेळा सांगता तरी ते तुमचे ऐकत नाहीत, आणि मग तुम्हाला काय मिळते? चीडचीडेपणा.  तेंव्हा तुमचे ज्ञान पुढे आले पाहिजे ' ठीक आहे, हा माणूस असाच असायला पाहिजे. तुम्ही काय करू शकता?  जय गुरु देव!' मग लगेच काय होते? कमीत कमी तुमचा मेंदू आरामात राहतो, तुमची चीड चीड होत नाही.

मग, मी काय म्हणालो? कुठल्याही परिस्थितीवर, माणसावर ताबा मिळवणे सोडा.  तुम्ही शांत असा; ताबा मिळवण्याची इच्छा ही खरी अडचण आहे. तुम्हाला कळले का? कुठल्याही  परिस्थितीत गोष्टी घडत राहतील, या अथवा त्या मार्गाने.  तुमच्याकडून जितके जास्त चांगले होईल तेवढे करा आणि बाकीचे सोडून द्या. संपले. कळले?

आता, याचा अर्थ आळस, नेतृत्व, पुढाकार घेणे किंवा सुव्यवस्था यांचा बरोबर गोंधळ घालू नका. मी काय सांगतोय ते कळत आहे ना? ही तारेवरची कसरत आहे. हुशार माणसाला ताबा न ठेवता पुढाकार घेणे जमते, कळले? ताबा मिळवण्याचा प्रयत्न न करता पुढाकार घ्या.  आणि एक वेळा नाही तर दहा वेळा सांगायचे धैर्य ठेवा.  अगदी पहिल्यांदाच असे म्हणू नका  की, "मी सांगितले आणि त्या माणसाने ऐकले नाही" नाही. तुम्हाला ते दहा वेळा सांगण्याचे धैर्य पाहिजे आणि तरी त्यांनी ऐकले नाही तरी तुम्ही काळजी करू नका.

हेच ज्ञान आहे, दहा वेळा सांगण्याचे धैर्य असणे. त्यांनी एकदाही केले नसताना तुम्ही दहा वेळा कसे सांगाल? तुम्ही म्हणता " अरे, ते करत नाहीत, ते तसेच आहेत" तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आळशी आहात, तुम्ही पुढाकार घेत नाही, तुमच्यामध्ये प्रतिबद्धता नाही. मी तुम्हाला एक अतिशय अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे, तुम्ही ऐकत आहात ना? तुम्ही एखाद्या गोष्टीशी बांधील असाल तर तुम्ही काय करता- तुम्ही करत राहता... बरोबर?

समजा तुम्हाला लाकूड कापायचे आहे, तुम्ही एकदा कापता, जर लाकूड मऊ असेल तर लगेच कापले जाते. पण जर लाकूड कडक असेल, तर तुम्ही काय करत राहता? मारत राहता. किती वेळा? ते तुटेपर्यंत. तुम्ही मारत राहता. आपण काय करतो, आपला मनात सर्वांसाठी एकच मापदंड असतो.  आपण म्हणतो की, "अरे, हे लाकूड एका फटक्यात कापले गेले म्हणजे सगळीच लाकडे एका फटक्यात कापली जाणार” आणि मग आपल्याला राग येतो. नाही.  काही कडक असतात काही मऊ असतात. प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ लागतो कापले जाण्यासाठी. आणि जर कापले जात नसेल तर ते लाकूड नाही, मग तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलवा.

तुम्ही शांततेत आहात. हा माझा निष्कर्ष आहे. काय? ताबा ठेवू नका, त्यांना ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जाऊ देत. पण त्यांना मार्गदर्शन करत राहा; ते ऐकत नसतील तर ते त्यांच्याच डोक्यावर चिखल उडवून घेत आहेत. तुम्हाला माहिती आहे, हत्तीला अंघोळ घालायला चार-पाच लोक लागतात. कधी कधी ते हत्तीला खाली झोपायला लावतात आणि बादल्या बादल्या पाणी ओततात. तुम्ही हत्तीला अंघोळ करताना बघितले आहे का? नाही? अरे, तुम्ही जेंव्हा बेंगलोरला याल तेंव्हा एक नाही दोन हत्ती आहेत. घासायला दोन तास, स्पा बाथ सारखे करतात! रोज त्यांना घासले जाते, आणि पाणी ओतले जाते.  मग, ते चमकतात, दहा मिनिटे त्यांना सोडा आणि ते चिखल सगळीकडे उडवतात. त्यांना काही कळत नाही, 'मी आताच अंघोळ केली आणि मी माझ्यावर परत चिखल उडत आहे’. ज्या क्षणी त्यांना चिखल आणि माती दिसते, ती ते उचलतात आणि स्वतःच्या डोक्यावर उडवतात आणि परत मळतात (हशा) काय करायचे? हं.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मैत्रीपूर्ण राहण्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कसे मित्र असावेत? आणि जर ते माझ्या बाजूने उभे राहत नसतील किंवा माझ्यावर विश्वास ठेवत नसतील तर काय करावे?
श्री श्री रवी शंकर: ऐका, कोणालाही विश्लेषण करू नका. हा एक निष्कर्ष आहे. कोणाचेही विश्लेषण करणे थांबवा. कुणाचेही विश्लेषण करायला वेळ कुठे आहे, आणि तुमचेही विश्लेषण करू नका. आरामात राहा, प्रत्येक गोष्टींची काळजी घेणारी शक्ती आहे आणि ती शक्ती तुमच्यावर प्रेम करते. हे जाणून घ्या आणि आरामात राहा. बरोबर? सर्वोत्तम कल्पना? तुम्ही शांत राहा, आणि तुमची मदत होईल. दुसरे कोणी तुम्हाला मदत करणार नाही; तुमचे तुम्हालाच करायला लागेल. आणि निसर्ग आपल्याबरोबर आहे,  आपल्याबरोबर एक शक्ती आहे की जी दुसरे कोणी समजू शकत नाही., आपण स्वतः सुद्धा नाही.  म्हणून, त्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि आरामात राहा.

प्रश्न: प्रिय गुरुजी, तुम्हाला माहिती आहे का की मला काही वाईट गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी सेवा आणि पार्ट २ शिबीर दर तीन महिन्यांनी करायचे आहे. पण माझ्या कुटुंबातील लोकांमुळे मी ते करू शकत नाही. गुरुजी, काय करू? कृपया मदत करा.
श्री श्री रवी शंकर: वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही वेबकास्ट बघत आहात; जिथे आहात तिथे ध्यानाला बस. हं. हो. हे तुमच्या अस्वस्थपणाचे कारण नसावे. ठीक आहे? इतके ज्ञान आहे., ध्यानाच्या इतक्या सी.डी. आहेत. ते रोज करा. तुमची साधना करा; कोणीही तुमचा ध्यान करण्याचा हक्क काढून घेऊ शकत नाही. वेळ काढा आणि तुमचे ध्यान करा.  हे ज्ञान तुमच्या जागृतावस्थेत ठेवा. एवढे पुरेसे आहे. संधी नक्कीच येईल, आणि तुम्हाला सांगायला लागणार नाही, ' दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी' असे.. हं? जेंव्हा शक्य असेल तेंव्हा या, आणि जर एक वर्षात एकदाही झाले नाही तर आणखी थोडे प्रयत्न करा.  कमीत कमी वर्षातून एकदा एडव्हान्स कोर्स करा.

प्रश्न:  प्रिय गुरुजी, तुम्ही देव, प्रेम पहिले आहे का?
श्री श्री रवी शंकर: अरे, तू स्वतःला पाहिले आहेस का? आरशामध्ये नाही. देव काही डोळ्यांनी बघायची वस्तु नाही. तुम्हाला ते माहिती करून घेतले पाहिजे. तुम्ही देवाला बघितले असे म्हणत असाल तर त्याचा अर्थ  देव कुठेतरी आणि तुम्ही कुठेतरी असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही दर्शक आहात आणि ते दृश्य. देव कधीही दृश्य असू शकत नाही, देवच दर्शक आहे, नजर ठेवणारा......हं?  आणि तुम्ही आहात, तुम्ही ते असू शकता. जेंव्हा मन स्थिर असेल तेंव्हा तुम्ही तिथे असू शकता, त्याचा आधी नाही.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझ्या बहिणीला एक जण आवडतो पण माझे कुटुंब परवानगी देणार नाही. माझा विश्वास आहे की ही तिची निवड आहे. मी जर तिला या माणसाबरोबर राहू दिले तर मी माझ्या घरच्यांशी खोटे बोलल्यासारखे होईल की जे मला करायचे नाही. मी काय करू?
श्री श्री रवी शंकर: शांतता बनवून ठेवा. हो. तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगितले नाही तर दोन्हीकडून फसवल्यासारखे होईल, त्यांना वाटेल की तुमच्या बहिणीने त्यांचाबद्दल आदर ठेवला नाही आणि तुमच्यावरच विश्वास पण जाईल. ते चांगले नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांना कल्पना द्या. आणि जर तुम्हाला असेल वाटले की ही व्यक्ती योग्य आहे तर तुम्ही वकील पण बना (हशा)

चालत रहा आणि भाव उच्च ठेवा

भव्य विश्व सांस्कृतिक महोत्सवानंतर बर्लिन मध्ये, स्वयंसेवकाच्या गटाने श्री श्री समोर आपले अनुभव सांगितले 

श्री श्री रवि शंकर : अडचणी हे बघण्यासाठी येतात की तुम्ही त्यातून पार होवू शकता की नाही, तुमच्यात शक्ती आहे. तुमचा भाव नेहमी उच्च असायला हवा. काही फरक पडत नाही, काही हरकत नाही, पुढे चला आणि भाव उच्च ठेवा. हा महत्वाचा धडा आहे - मग तुम्हाला घटनांचा काहीच फरक पडत नाही. अडचणीतूनच तुम्ही शिकत जातात. ह्या तात्पुरत्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे हसत हसत बघा.

प्रश्न: माझे साहेब खूप हट्टी  आहेत. आमच्यात  खूप वाद  होतात. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: सोपे आहे. तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते वेगळ्या पद्धतीने म्हणा. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका माणसाची बायको खूप हट्टी होती.ती नेहमी नवरा जे म्हणेल त्याच्या उलट करायची. नवरा निराश झाला आणि एका स्वामीकडे सल्ला मागण्यासाठी गेला. स्वामी त्याच्या कानात काही तरी पुटपुटले. तीन महिन्या नंतर, स्वामी त्याच्या शहरात आले आणि त्यानी त्याला आनंदित बघितले. त्याने स्वामीजींचे आभार मानले आणि म्हणाला,"तुमची युक्ती कामी आली.स्वामीजींनी त्याला सल्ला दिला जे काही पाहिजे आहे त्याच्या उलट मागायचे. उदाहरणार्थ, जर त्याला तळलेले बटाटे हवे असतील तर त्याने बायकोला बिना तळलेले बटाटे मागायचे. आपण आपल्या मनाला कसे सांभाळतो यावर अवलंबून आहे. जेव्हा संभाषण तुटून जाते तेव्हा बोलू नये. कडक लोक तुमचे गुण वाढवतात.

प्रश्न: तुम्हाला निराशा कमी करण्यासाठीच्या औषधाबद्दल तुम्हाला काय वाटत?
श्री श्री रवि शंकर: ज्ञानात राहा. ज्ञानाच्या गोष्टी ऐका आणि आपला अभ्यास रोज करा. मग तुम्ही नैराश्येत जाणार नाही. वैद्यकीय सल्ला माना आणि हळू हळू पुढे जा. सेवा करा, एका समुदायामध्ये सामील व्हा. जेव्हा तुमच्याकडे काही नसत, तेव्हा तुम्ही स्वतः बद्दल विचार करता आणि निराश होता.

प्रश्न: आम्ही कुणाला प्रार्थना करायची, तुम्हाला की देवाला? तुम्ही आमची प्रार्थना देवा पर्यंत पोहोचवाल किं तुम्हाला सरळ मिळतील?
श्री श्री रवि शंकर: प्रार्थना जन्मजात आहे. हे असे नाही जे तुम्ही मनाने करता किंवा मनात असत. ते आपोआप घडत जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते. प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न करू नका. आरामात राहा.देव फक्त एकाच आहे जो सगळ्यांसाठी काम करीत असतो. तुम्ही कुणालाही प्रार्थना करा, ती एकाच देवाला जाईल जो या ब्रम्हांडाच्या निर्मितीला कारणीभूत आहे. कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. मला तुमच्या सगळ्या समस्या द्या आणि आनंदाने घरी परत जा.

प्रश्न: तुम्ही सगळ्या प्रार्थनेचे उत्तर देता?
श्री श्री रवि शंकर: तुम्ही काय मागता या बाबत काळजी पूर्वक राहा. तुम्ही नेहमी शेवटी एक वाक्य जोडायला हव, "आणि जे काही योग्य असेल ते."

गुरु पोर्णिमा विशेष

गुरु सिद्धांत आयुष्यात महत्वपूर्ण आहे. पहिला गुरु हा दक्षिणामूर्ती आहे. अनंताचे अवतार कुशाग्रतेने विणले गेले की परिमित आणि अनंतासोबत अस्तित्वात राहतात. गुरु तत्व हे सर्व मनुष्यात आहे. ती बुद्धिमत्ता प्रत्येकात लागू आणि जागृत करायला हवी.

हे तत्व जेव्हा जागृत होते, आयुष्यातील कष्ट दूर होते. हे कष्टाचे औषध आहे, सर्व विद्येचे धन आहे.

गुरवे सर्व लोकानाम- दिव्य चेतना हा पूर्ण जगाच्या जगतातली प्रमुख प्रकाश आहे.
बिशाजे भव रोगीणाम - हे औषध आहे समाजातील रोग्यांसाठी, आयुष्यासाठी, दु:खीतांसाठी. हे सगळे कष्ट दूर करतो.
निधाय सर्व विद्यानाम श्री दक्षिनामुर्तये नमः   - मी या चेतनेला शरण जातो जे माझ्या हृद्यात आहे.

गुरु शब्दाचा अर्थ आज विशेषज्ञ म्हणून केला जातो - जसे व्यवसाय प्रबंधात विशेषज्ञ. गुरु म्हणजे असाधारण, मोठे. अर्थातच, विशेषज्ञ हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्यात पूर्णता आहे. गूढता आहे. आपल्या चेतनेत, बुद्धिमत्ता तेव्हाच आयुष्यात येते जेव्हा गुरु तत्व आयुष्यात असते.जेव्हा आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हा गुरु तत्व आयुष्यात येते. तुम्ही कधी कुणासाठी काही करण्याची इच्चा केली आहे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता? मग तुम्ही गुरु होण्याची भूमिका पार पाडली.आई ही पहिली गुरु आहे. मग आपले शिक्षक येतात - विना शिक्षक  आणि इतर अनेक. सदगुरु सत्याचे ज्ञान,अंतिम वास्तविकता, अध्यात्मिक ज्ञान देतो.
गुरुपोर्णिमेला प्रत्येकाने चिंतन करावे, " मी कुठे होतो हे ज्ञान मिळण्यापूर्वी? मी आता कुठे आहे?" तुम्ही जेव्हा विपरीत बघता तुम्ही या ज्ञानाशिवाय कुठे होतात, तर आभार व्यक्त होतो.
या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा देखील म्हटले जाते. व्यासांनी ही ज्ञानाची विद्या ४ वेदात श्रेणी बद्ध केली आहे, उपनिषद, उपवेद, २७ स्मृती, २७ उपस्मृती - एक मोठ्ठी ज्ञानाची विद्या जीवनाच्या प्रत्येक बाबींशी संबंधित आहेत आयुर्वेद ते वास्तुशास्त्र ते चिकित्सा ते औषध.ही पोर्णिमा त्यांच्या नावावर आहे.

हा दिवस आपण त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवतो ज्यानी मानव जातीच्या भल्यासाठी काम केले आहे . आपण लक्षात ठेवतो त्यांनी काय केले.
तुम्ही किती नशीबवान आहात तुमच्या आत अनंत अनुभव आहेत. या विशिष्ट साच्यात शरीर आणि मन जडलेला आहे. शरीर आणि मन सीमित आहेत पण भावनेची अभिव्यक्ती अनंत आहे.
साधकासाठी, नवीन वर्ष म्हणजे गुरुपोर्णिमा आहे. जेव्हा बाकीच्या जगासाठी ही अर्धी वाट असते, आम्ही अध्यात्मिक मार्गावर पूर्ण वर्ष साजरा करतो. आपल्या जीवनात दिव्य अभिव्यक्तीच, दिशेचं एक वर्ष आहे. एक वर्ष एकरूपतेची भावना आणि जगाला गुरूच्या चक्षूने बघणे. गुरू हा मार्गदर्शन करणारा आहे. मला ते करू द्या जे एका गुरुने, एका भल्या माणसाने या परिस्थितीत केले असते. बुद्धिमान व्यक्ती कधी प्रतिक्रिया देणार नाही. ते उत्तर देतील. तुम्ही शिकाल जेव्हा स्वतःला  त्या जागी ठेवाल (गुरु किंवा बुद्धिमान व्यक्ती) पुन्हा पुन्हा अनंत धेय्याचे प्रयत्न, विशाल बुद्धिमत्ता, पूर्ण दया आणि आनंद.

कुणालाच माहित नाही ही प्रथा कधी सुरु झाली. करोडो वर्षांपूर्वी, या पृथ्वीवर, किती सारे संत आणि ऋषी होऊन गेले आणि किती तरी पुढे भविष्यात होतील. आपण त्या सगळ्यांचे ज्ञानाच्या योगदानासाठी  भूतकाळात, वर्तमानात, आणि भविष्यात आभार मानतो. बुद्धीमत्तेशिवाय हे जगणे नाही, फक्त आहेच. आयुष्याची सुरुवात बुद्धिमत्तेने होते.

या गुरुपोर्णिमेला तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल विचार करा आणि आभार व्यक्त करा. सगळे गाऊ या आणि आंतरिक आनंदात डुबून जाऊया.

गुरु पूर्णिमा संदेश

एका  वर्षात १२ - १३ पोर्णिमा येतात त्यापैकी वैशाख पोर्णिमा संबोधली जाते जन्म आणि ज्ञानासाठी, ज्येष्ठा पोर्णिमा पृथ्वी मातेला आणि आषाढ पोर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. ह्यालाच  गुरुपोर्णिमा असे म्हणतात.

हा तो दिवस आहे जेव्हा शिष्य आपल्या गुरूंच्या परीपुर्णतेत जागे होतात आणि जागे करण्यासाठी गुरुला कृतकृत्य होतात. हा आभार द्वैत (तुम्ही आणि मी) नाही तर अद्वैत आहे. ही नदी नाही जी एकीकडून दुसरी कडे वाहत जाईल. तर हा सागर आहेत जो स्वत्वात चालतोय. म्हणून, गुरु पूर्णिमा ही कृतज्ञतेच प्रतिक आहे.

गुरुपुर्णिमा उत्सवाचा उद्देश आहे मागे वळून बघणे आणि मागच्या एक वर्षात आयुष्यात किती प्रगती केली हे पाहण. एका साधका साठी गुरुपुर्णिमा एक महत्वाचा दिवस आहे, नवीन वर्षाचा एक दिवस आहे. हा दिवस आहे एखाद्याचा अध्यात्मिक मार्गावरील प्रगतीचा आढावा घेण्याचा आणि दृढ संकल्पाला नविनिकृत करण्याचा आणि आपल्या ध्येयावर  केंद्रित करण्याचा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षात काय करायचे आहे यावर मार्ग काढणे. जसा पौर्णिमेचा चंद्र उगवतो आणि मावळतो, कृतज्ञतेचे अश्रू निर्माण होतात आणि स्वतःच्या विशालतेत सामावून जातात.

तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरात लाखो जीवकोश आहेत आणि प्रत्येक कोशाला त्याच स्वतःच आयुष्य असत.बरेच जीवकोश रोज जन्म घेतात आणि मरण पावतात. म्हणून, तुम्ही एक फिरते शहर आहात.कित्येक शहरं या पृथ्वी ग्रहावर  आहेत आणि पृथ्वी ग्रह सूर्या भवती फिरत असतो. त्याच प्रमाणे, कित्येक जीवकोश आहेत आणि कित्येक  जीवजंतू तुमच्या शरीरात आहेत आणि तुम्हाभोवती फिरतात. तुम्ही एक फिरती वस्ती आहात. एका मधाच्या पोळ्यासारख, कित्येक मधमाश्या येतात आणि त्यावर बसतात, पण तिथे एक  राणी मधमाशी असते. जर राणी मधमाशी गेली तर दुसऱ्या माश्या पण जातात.त्याच प्रमाणे,आपल्या शरीरातही परमाणु असतात राणी मधमाशी. जर ते तिथे नसेल तर, सगळाच निघून जाईल. माहित करायच, त्यात छोट्या परमानुचा सगळ्यात छोट स्वरूप, आत्मा किंवा स्वत्व.ती सगळीकडे आहे तरीपण कुठेही नाही. तीच  राणी मधमाशी आहे आणि तेच तुम्ही आहात. आणि तेच दिव्य आहे, आणि तेच गुरु तत्व आहे. ज्याप्रमाणे पितृत्व, मातृत्व, त्याप्रमाणे गुरुत्व देखील आहे. तुम्हाला कोणा ना कोणा सोबत गुरुत्व साकारावं लागत. तुम्ही खेळा, तुम्ही लोकांना जाणत्या किंवा अजाणते पणाने सल्ला द्या आणि मार्गदर्शन करा, आणि त्यांची काळजी घ्या आणि प्रेम द्या. पण हे पूर्ण १०० टक्के करा कुठलीही परतीची अपेक्षा ना करता.त्यालाच गुरुत्वात जगणे म्हणतात, स्वत्वात जगणे. दिव्य, तुम्ही आणि गुरु तत्व यात काहीच फरक राहात नाही. हे सगळ एकाच गोष्टीवर येतं, राणी माशीवर. ध्यान हे आराम आणि विश्रांती ह्यात एक परमाणु सारख आहे.

सर्व गोष्टींचा विचार करा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतंय, आणि विचारा तुम्हाला काय हवय. आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आपण सर्व काही प्राप्त करतो, पण प्राप्त करणेच पुरेसे नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांना आपण द्यायला हवे आणि आशीर्वाद द्यावा.

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुमचे आयुष्य गुरु तत्व आहे. तुमच्या आयुष्यावर एक प्रकाश झोत टाका. ज्ञान जे तुमच्या आयुष्यातून उजळेल - तुम्ही आदर दिला पाहिजे, आणि त्यालाच गुरूचा आदर म्हणतात.  हे पहा, आयुष्याने तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवल्या आहेत - तुम्ही काय चुकीचे केले आणि काय बरोबर केले, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकला नाही, तर गुरु तिथे नसतो.  तुमच्या आयुष्याकडे बघा आणि आयुष्याने दिलेल्या ज्ञानाचा आदर करा. त्यालाच गुरूचा आदर म्हणतात. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हे काहीतरी महत्वाचे आहे.

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुम्ही आयुष्यावर प्रकाश टाकता, आणि जेंव्हा ज्ञान असते, ज्ञानाचा आदर करा. ज्ञान हेच गुरुतत्त्व आहे. तर, तुमच्यामध्ये गुरु तत्व आहे, ज्ञान आहे. प्रत्येकामध्ये ज्ञान आहे.  त्यावर प्रकाश टाका. आयुष्यात ज्ञान म्हणजे पाहत आहे; ज्ञान आले आहे;ज्ञानाचा आदर करा. आपण जेंव्हा ज्ञानाचा आदर करणे थांबवतो तेंव्हा अंधार येतो, तेंव्हा  पौर्णिमेचा चंद्र नसतो, तिथे चंद्रच नसतो. चंद्र म्हणजे मन आणि आणि जेंव्हा तो ज्ञानाने पूर्ण भरलेला असतो तेंव्हा गुरु पौर्णिमा असते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही आयुष्याने काय शिकवले त्याचा आदर केलात तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी गुरु पौर्णिमा असू शकते.

बऱ्याच वेळा आपण आपले तोंड दुसरीकडे फिरवतो, डोळे बंद करतो आणि आपल्या इच्छा गिळून टाकतो. मला हे, हे, हे आणि हे हवे आहे - ज्ञानाचा मान न ठेवता आपण इच्छा गिळून टाकतो.  हे पहा, देणाऱ्याने तसेही दिले आहे, त्याने तुम्हाला खूप काही दिले आहे. पहिली गोष्ट ही की ज्ञानाचा आदर ठेवा, दुसरी गोष्ट अशी की या गुरु पौर्णिमेला तुम्हाला दिली गेलेली भेट वापरा.  तुम्हाला खूप आशीर्वाद दिले गेले आहेत. तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचा वापर करा आणि तुम्हाला अजून मिळेल. त्देणारा न दमात देत आहे आणि तुमच्याकडून काही ओळख पण नकोय आणि तुम्हाला असे भासवतो की ते तुमचेच आहे.  देणारा देतो आणि तुम्हाला अशी भावना देतो की ते तुम्ही मिळवले आहे. देणाऱ्याला अंत नाही, आणि देण्याने तो दमणार पण नाही, देणारा देतो;  अनंत तुम्हाला भरपूर देत राहतो, आणि आपल्याला जे मिळाले आहे ते आपण चांगल्यासाठी वापरले पाहिजे.

तुम्हाला एक चांगले भाषण दिले आहे; ते चांगल्यासाठी वापरा. तुमचे भाषण तक्रारींसाठी, आरोपांसाठी, वाईट गोष्टी बोलण्यासाठी वापरू नका. तुम्हाला उत्तम बुद्धी दिली आहे, बुद्धी वापरा. लोक बुद्धी वापरण्यामध्ये इतका कंजूसपणा का करतात ते मला कळत नाही.   तुम्हाला वाईन माहित आहे, ती जेवढी जुनी होईल तेवढी चांगली आणि महाग होत जाते. मी असे  ऐकले आहे, वाईन कधी घेतली नाही. त्याच प्रमाणे बुद्धी वापरा ती चांगली होत जाईल. आपण ते जेव्हडे चांगल्यासाठी वापरू, तेव्हडी ती जास्त तरतरीत होत जाईल. काळजी करू नका. तुम्ही असा विचार करू नका की बुद्धी वापरल्याने कमी होईल. ती न वापरल्याने, ती कमी होईल. तुमची बुद्धी चांगल्यासाठी वापरा. तुमचा आवाज सुस्वर असेल, तर चांगल्यासाठी वापरा. तुमच्या शरीरात ताकद आहे, सेवा करा.  तर, आपल्याला जे काही दिले गेले आहे, ते चांगल्यासाठी वापरा. जेंव्हा मी चांगल्या वापरासाठी म्हणतो, तेंव्हा ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, जगासाठी वापरा. देवत्व जगात राहते. तर जगाची सेवा करणे म्हणजे देवत्वाची पूजा आहे.

ज्ञानाचा आदर केल्याने आयुष्याचा स्तर उंचावतो. आणि तुम्हाला हे दोन जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता आणि जेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता, भावनांनी पूर्ण, तेंव्हा ते अनंताला भावते. एवढेच  !

हे जाणून घ्या की प्रत्येकामध्ये गुरु आहे आणि ज्ञानाचा प्रकाश देतो आहे, तिथे आरती करा, तिथे आत असलेल्या गुरु साथी. आरती करणे म्हणजे काय? परमानंद, अशा परमानंदामध्ये ज्ञानाबरोबर जाणे, आयुष्याने आपल्याला काय दिले आहे त्यावर प्रकाश टाकणे. सत्य काय आणि असत्य काय? बरोबर काय आणि चूक काय? आपण जे बरोबर नाही ते का निवडले, ते करायला आपल्याला कशाने भाग पडले आणि बरोबर काय आणि चूक काय? हे तुम्हाला कुणाला विचारायला नको. तुमच्या आतले काहीतरी तुम्हाला सांगते. हो की नाही? आत काहीतरी टोचते, हे चुकीचे आहे. त्याचा आदर करा, आदर करा! तुम्ही ऐकत आहात? सगळे?

हे खूप सोप्पे आहे, तरी गहन आहे.

तुम्हाला माहिती आहे, धार्मिक असणे आणि धार्मिकता न दाखवणे ही एक सुंदर गोष्ट आहे. जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि भेटवस्तू दिल्याची भावना दिली, तर ती भेट आहे? बघ, मी तुला भेट देतो आहे, मी तुला भेट देतो आहे. दहा वेळा कोणीतरी सांगते आणि हातात चोकलेट देते, तुम्ही काय म्हणता? तुझ्याकडेच ठेव, मला नको. त्याचप्रमाणे जेंव्हा धार्मिक असूनही आपण धार्मिकता दाखवत नाही; मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. धार्मिकता दाखवणे राग आणते, निराशा आणते आणि या ना त्या दृष्टीने चुकीचे ठरवते. एका दृष्टीने तुम्ही बरोबर असाल. दुसऱ्या दृष्टीने तुम्ही चूक असता. तुम्ही माझ्याबरोबर  आहात ना? याचा काही अर्थ आहे का? बरोबर असणे आणि धार्मिकता न दाखवणे, शुद्ध असणे आणि त्याचा अभिमान नसणे, दयाळू असणे आणि त्याचे प्रदर्शन न मांडणे - मी काय म्हणत आहे ते तुम्हाला दिसते आहे का?  हुशार असणे आणि ' पहा मी किती हुशार आहे' असा बाजा न वाजवणे - त्यातला रस निघून जातो, बरोबर, तुम्ही काय म्हणता? हुशार असणे आणि स्वाभाविक असणे, अगदी स्वाभाविक, साधे, साधेपणा; कधी कधी  मूर्ख बनायला पण तयार असणे. हे खूप सुंदर ज्ञान आहे. तुमचे आयुष्यच हे तुमच्याकडे आणते आणि तुमच्या आयुष्यात दाखवते. तुमच्या आयुष्यावर चिंतन करा, परत परत आणि परत आणि परत आणि परत. खूप छान!

खोलीच्या शेवटी लांब इकडे तिकडे करणाऱ्या लोकांकडे पाहून, श्री श्री म्हणाले:

काही लोक असतात की जे सारखे वर खाली जात असतात, त्यांना माहित नसते की कुठे जायचे किंवा काय करायचे. तिथेच आपल्याला मार्गदर्शक लागतो, एक गुरु, काही लोक त्याच रस्त्यावरून वर खाली करत असतात, दार कुठे आहे हे माहित नसते , आणि कुठून आत जायचे ते माहित नसते. पहा, आजूबाजूच्या लहान लहान गोष्टी नीट पहिल्याने सुद्धा किती टरी शिकायला मिळते.

एका संताबद्दल एक गोष्ट आहे; मला वाटते संत रामदासांची . ते पहाटे एका गावातून चालत निघाले होते आणि एक बाई, तिच्या झोपडीच्या बाहेर समोर झाडत होती, आणि ती म्हणाली, 'राम उठ, अजून किती वेळ झोपणार आहेस?', तिने तिचा आत झोपलेल्या मुलाला हाक मारली. एक तरुण मुलगा, ज्याचे पण नाव राम होते. जेंव्हा त्या संताने ते ऐकले , ज्याचे नाव राम होते, तो लगेच म्हणाला, ' अरे, कोणीतरी मला जागे व्हायला सांगत आहे'. असे म्हणतात की त्याच क्षणी तो खरोखरच जागा झाला. म्हणाला, 'वाह!', खरच तो इतका उत्साहित झाला. ते म्हणाले, त्यानंतर मी कधी झोपलोच नाही, मी इतका तरतरीत झालो, माझे मन सारखे भूतकाळ आणि भविष्यकाळात जाऊन उसळत होते'.

त्याला कोणीही सांगितले नाही, की तू हे केले पाहिजेस, तू ते केले पाहिजेस आणि मान तुला असे फिरवू शकते. आपले मान त्याची स्वतःची माया बनवते, स्वतःचे जग बनवते, त्याचा स्वतःचा बुडबुडा आणि आपण स्वतःच्याच बुडबुड्यात फिरत राहतो. आपण सगळे जग आपल्याच चष्म्यातून पाहत असतो आणि सगळे तसेच मनात असतो. याला विपर्याय म्हणतात.

विपर्याय म्हणजे रंगवलेली दृष्टी, बरोबर नसलेली दृष्टी. तर गुरु तत्व किंवा ज्ञान असा प्रकाश आहे की ज्याने तुम्ही खरच जागे होता अनो पाहता - ओह, हे असेच आहे!

मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असे वाटले की तुमची मते चुकलेली आहे?

पहा, बऱ्याच वेळा तुमचे निर्णय चुकले आहेत पण तुम्ही जेंव्हा निर्णयात होता, तुम्ही विचार केलात की या गोष्टी अशाच आहेत - तो बुड बुडा आहे ज्यात आपण असतो, गुरु तत्व म्हणजे बुड बुड्यातून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे,  गुरु तत्व म्हणजे त्या बुड बुड्या मधून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे, आयुष्याने दिलेल्या ज्ञानावर प्रकाश टाकणे. हे पहा. मग आपण पाहतो की आपले निर्णय अधिकाधिक बरोबर होत जातात. आता ९०% निर्णय चुकीचे असतील आणि १०% बरोर, हे खरेतर उलटे झाले पाहिजे. ९०% बरोबर आणि १०% चूक, २% किंवा ३% किंवा १०% चुकणे ठीक आहे.
१. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमचा गुरु आहे.
२. आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. हे लहान मुलांच्या शाळेतील शिक्षकांसारखे नाही- तुम्ही काहीतरी शिकता आणि जाता आणि बस्स, पण आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहे.
३. तुमच्या आयुष्यातील ज्ञान तुमचा गुरु आहे. आयुष्यावर प्रकाश टाका आणि त्यानेच ज्ञान येते.
४.देणाऱ्याने तुम्हाला भरपूर दिले आहे आणि देत आहे, त्याचा चांगला वापर करा. आपण आपल्या क्षमतांचा जेव्हडा चांगला वापर करू तेवढे जास्त आपल्याला मिळत जाते.
५. ज्ञानाचा आदर करा. तुम्हाला माहिती आहे, ज्ञान, त्याचा आदर करा कारण गुरु आणि ज्ञान अविभाज्य आहेत आणि आयुष्य आणि ज्ञान अविभाज्य असावेत. कधी कधी आपण आपले आयुष्य ज्ञानाशिवाय घालवतो. मग तिथे गुरु तत्व नसते. तुम्ही गुरूचा आदर करत नाही. समजले. ते सदगुरू आहे.
६. धार्मिक राहा आणि धार्मिक पणा दाखवू नका. धार्मिकपणा दाखवणे तुम्हाला या ना त्या मार्गाने चूक ठरवतो आणि राग आणि निराशा आणतो. तसेच चांगले असण्याचे पण आहे. जर तुम्ही असे म्हणाल की मी चांगला आहे तर तुम्ही असा विचार करता की बाकीचे वाईट आहेत. ‘मी खूप चांगला आहे’ ते दु:खी  भाव आणते. जे लोक स्वतः खूप चांगले आहेत असा विचार करतात ते स्वतः वाईट आहे असा विचार करणार्यांपेक्षा आनंदी असतात. जे लोक स्वतःला वाईट समजतात, ते काळजी करत नाहीत, पण जर कोणी म्हणेल की ' मी चांगला आहे', तर ते विचार करतात, ' हे माझ्याबरोबर काय होत आहे'. तर मी जर असा विचार केला, ' मी खूप चांगली आहे', माझा चांगुलपणा दाखवणे मला दु:खी बनवू शकते. माझा धार्मिकपणा दाखवणे मला रागिट बनवते. चांगले राहा आणि चांगुलपणा दाखवू नका. इतरांना त्याबद्दल बोलू देत; तुम्ही स्वतःच स्वतःचा बाजा वाजवू नका. दयाळू राहा पण दयाळूपणा दाखवू नका.

आपल्याला हेच करायचे आहे - परत आणि परत परत या गोष्टी गोळा करायच्या आहेत, आणि आपल्या बुद्धीने परत परत शोषून घ्यायचे आहे. हाच सत्संग आहे. सत्संग म्हणजे सत्याबरोबर असणे, हुशारी बरोबर असणे, तुमच्या आत असलेल्या ज्ञानाबरोबर असणे. तुमच्या आतील सत्याबरोबर हात मिळावा, समजले?

देणारा देऊन दमला नाही. तो देऊन कधी दमात नाही आणि ते तुमचेच आहे अशी भावना तुम्हाला देतो. तो दयाळूपणे तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल अशी भावना देत आहे, ' अरे पहा, हे माझे आहे'. खरेतर, तुमचे काहीच नाही. पण देणारा असा देतो की तुम्हाला घेतल्यासारखे वाटत पण नाही. काय? देणारा असे देतो की ते तुमचेच आहे असे तुम्हाला वाटते, तुम्ही घेतले पण नाही, तोच मोठेपणा आहे आणि तीच सुंदरता आहे.

त्याचप्रमाणे, त्या बाईचे स्वतःच्या मुलाला उद्देशून ओरडणे त्या संताला जागे करू शकले आणि आत्मसाक्षात्कार होऊ शकला, तेच होते - बाई म्हणाली: ' राम तू किती उशीरपर्यंत झोपणार आहेस, जागा हो. कधीपर्यंत झोपणार आहेस?', उठ आणि तिथूनच रामदास स्वामींचा प्रवास सुरु झाला. तुम्ही जागे होण्यासाठी निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या संधी देत आहे, तुम्ही कधीपर्यंत झोपणार आहात, तुम्ही तुमचे मन कधीपर्यंत  वापरत बसणार आहात का, का, का, का. तक्रार करणारे, रडणारे ओरडणारे मन, जागे व्हा, आयुष्य खूप कमी आहे. या कमी वेळात आयुष्याचा मन ठेवा! ते इतके अनमोल आहे. तुमची कौशल्ये आणि संसाधने , जी तुमच्या दाराशी आली आहेत यांचा चांगला वापर करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा चांगला वापर करा, तुमचा आवाज, तुमची बुद्धी. कुणी कौतुक करो अथवा ना करो, तुम्ही गा.

अध्यात्मिकता आनंदाबरोबर सुरु होते!

प्रश्न: गुरुजी, विज्ञानाने अध्यात्मिकता समजावता येऊ शकते का?  ही निर्मिती जी विज्ञान अजून सांगू शकला नाही त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटते. वेदांमध्ये याचे उत्तर आहे का?
श्री श्री रवि शंकर : हो, मनोरंजन ही योगाची सुरुवात आहे. जेंव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनोरंजक वाटते तेंव्हा तुम्ही निसर्गातील सत्यांबद्दल प्रश्न विचारू लागता तेंव्हा तुमचा प्रवास सुरु होतो. हे उत्तम आहे. ‘विस्मयो योग भूमिका,’ अध्यात्मिकता मनोरंजनाबरोबर सुरु होते
आणि नंतर ते कायम अम्युजमेंट पार्क मध्ये असल्यासारखे वाटेल. तुम्ही आश्चर्यचकित होता, वाव! हे काय आहे? हे जग काय आहे? किती प्रकारची झाडे, पाने, फुले, फळे, भाज्या, माणसे, हे काय आहे? जेंव्हा असा विचार येतो तेंव्हा ज्ञान सुरु होते.

प्रश्न: गुरुजी, जर आपण घटना आहे तशी स्वीकारली तर आपण निर्माण क्षम कसे होऊ?
श्री श्री रवि शंकर : हे तुम्हाला शिबिरामध्ये (आर्ट ऑफ लिव्हिंग चा पार्ट १ शिबीर ) कळले असेलच, बरोबर? स्वीकार म्हणजे निष्क्रियता नव्हे; स्वीकार म्हणजे आत्ताची परिस्थिती ओळखणे.

तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मुलाला माहिती पाहिजे की ते जगातील प्रत्येक रुढीचा भाग आहेत. पाकिस्तानींचे पूर्वज हिंदू होते, बौद्ध, जैन होते; खूप पूर्वज या पुरातन पद्धतींचे होते. काही पारसी होते. पाकिस्तानातील मुलांना उपनिषद शिकवले पाहिजे, थोडे योग आणि ध्यान. योगाचा जन्म पाकिस्तान मध्ये झाला; जन्म म्हणजे आता ज्याला पाकिस्तान म्हणतो त्या भागात योग शिकवला गेला आणि तिथे त्याचा प्रचार झाला.

अध्यात्मिक ज्ञान नसल्यामुळे खूप लोक सर्व प्रकारचा प्रचार करतात, त्याच्याबद्दल त्यांना खरी  माहिती नसते. म्हणूनच लोकांना अध्यात्मिक ज्ञान देणे हे आपले महत्वाचे कर्तव्य झाले आहे. तुम्हाला असे वाटत नाही का?
आपण आता खूप कार्यक्षम झाले पाहिजे आणि सर्व प्रकारची अंधाधुंदता दयेमध्ये रुपांतरीत होईल आणि तीच अंधाधुंदता चांगले काम करण्याच्या प्रतीबद्दतेमध्ये रुपांतरीत होईल हे बघितले पाहिजे. हो की नाही. आपण त्यासाठी काम केले पाहिजे. हो.

प्रश्न : प्रिय गुरुजी, सुदर्शन क्रिया डी. एन. ए. बदलू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो.

प्रश्न : गुरुजी, टीका स्वीकारण्याइतके स्वतःला मजबूत कसे बनवू? 

श्री श्री रवि शंकर: हे पहा, तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका, टीका अगोदरच झाली आहे, हो की नाही? तुम्हाला पर्याय नाही. फक्त कोणी बोलले की तुम्हाला टीका झाल्याचे कळते, बरोबर. त्यांनी बोलल्याशिवाय तुम्हाला कसे कळेल? कोणी तुमची टीका करेपर्यंत तुम्हाला माहिती नसते. त्यांनी टीका केल्यावर, ती झालेली आहे. तुम्हाला काय पर्याय आहे? ओके, त्याचा स्वीकार करू नका, त्याने तुम्हाला काय होईल? तुम्ही आणखी दुःखी व्हाल. तुम्ही हुशार असाल तर त्याचा स्वीकार कराल, जर तुम्हाला  हुशार व्हायचे नसेल तर तुम्हाला काही काल त्रास सहन करायला लागेल. फक्त याच मार्गाने तुम्ही करू शकाल.

प्रश्न: गुरुजी, तुमची माझ्यावर कृपा आहे हे मी पहिले आहे. मला जे काही पाहिजे, माझ्या ज्या इच्छा आहेत, ते तुम्ही मला देता. असे कधीही झाले नाही की मला जे हवे ते मिळाले नाही पण इच्छा अशा आहेत की त्या संपत नाहीत आणि आता मला स्वतःची लाज वाटते आहे, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हे पहा, आता तुम्ही त्याबद्दल सजग झाले आहात, बरोबर? तुम्ही आता बरोबर रस्त्यावर आहात. गाडीने 'यु' टर्न घेतला आहे. काहीतरी मोठे मागा. छोट्या गोष्टी का मागता? आणि तुमच्यासाठी मागू नका, सगळ्यांसाठी मागा. तुम्ही जे मागाल, ते मिळेल.

प्रश्न: कधी कधी, माझे मूल ज्या शाळेत जाते ती शाळा मला आवडत नाही. मी त्याला शाळेतून काढून घरीच ठेवू का? 
श्री श्री रवि शंकर: नाही, शाळेचे वातावरण चांगले नाही म्हणून घरी राहणे चांगले नाही. मुले मंद होतील. आपल्याला शाळेतील पद्धती आणि या घटना बदलल्या पाहिजेत. म्हणूनच आपण इतक्या शाळा सुरु करत आहोत; आपण भारतामध्ये जवळपास १०० शाळा सुरु केल्या आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझी सासू इतर धर्मांच्या लोकांना प्रसाद वाटत नाही. त्यांचा तर्क असा आहे की ज्यांना प्रसादाचे महत्व कळत नाही त्यांना प्रसादाचा फायदा होत नाही. त्यांचा हा विचार मी कसा बदलू?
श्री श्री रवि शंकर: त्या करत नसतील तर काही फरक पडत नाही, तुम्ही सगळ्यांना द्या. प्रसादाचे पदार्थ खूप वेळा चांगले असतात, लोकांना आवडेल. तुम्हाला माहितीये, प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. त्यांचे असू देत, तुमचे मत तुमच्यापाशी, इथे काहीच संघर्ष नाही. तुम्हाला हवे ते तुम्ही करा.

प्रश्न: महत्वाचे काय आहे: वेदना, ज्ञान की प्रेम? 
श्री श्री रवि शंकर: हो, वेदना, ज्ञान आणि प्रेम नेहमी एकत्र असतात. कधी कधी एकाला खूप महत्व दिले जाते आणि कधी दुसऱ्याला जास्त महत्व दिले जाते. तुम्हाला दोन्ही बरोबर गेले पाहिजे. छान !

भ्रष्टाचार सुरु होतो जिथे आपलेपणा संपतो!

रश्न : आपल्या आयुष्याच अंतिम ध्येय काय असायला हव?
श्री श्री रवि शंकर : जर कुणी तुम्हाला अंतिम इच्छा काय आहे हे सांगितल तर निरर्थक आहे. या क्षणाला तुम्हाला गरज आहे ती आकांक्षेची. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे एक व्यापक दृष्टीकोन ठेवून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्हाला काय हवाय ते. स्वाभाविकच, तुम्ही दयाळू व्हाल आणि आपल्या देशाप्रती, पर्यावरण प्रती विचारशील राहाल आणि अश प्रकारे हे काम निरंतर करीत राहा मग आयुष्याचा अंतिम ध्येय काय हा प्रश्नच उद्भवणार नाही.

प्रश्न : मला कस कळेल मी आधात्मिक मार्गावर प्रगती करीत आहे?
श्री श्री रवि शंकर : बघा तुम्ही शांत आहात? गतिशील आहात? तुम्ही दोष, वाईट सवयींपासून मुक्त आहात आणि काय तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांशी आपलेपणाने वागता? हे काही उपायांपैकी उपाय आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी, तुम्ही नेहेमी म्हणता,"तुमच्या सगळ्या अडचणी मला द्या".पण मला काळजी वाटते कि मी सगळ्या अडचणीतून मुक्त झालो पण माझ्या अडचणींमुळे तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना?
श्री श्री रवि शंकर : नाही, काळजी करू नका. कमीत कमी तुमची थोडी तरी काळजी दूर झाली, जेव्हा तुम्ही काळजीत असता मी पण काळजीत असतो. तेव्हा तुम्ही आनंदात राहा.

प्रश्न : गुरुजी, पुराणात असे म्हटले जाते की पत्नी पुढच्या सात जन्मासाठी एकाच पतीची कामना करते. हे खरे आहे का?
श्री श्री रवि शंकर : पहा, या प्रश्नाच उत्तर द्यायला मी योग्य नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना विचार आणि शोधून काढा. कुणी हो म्हणेल कुणी नाही, एक जनगणना घ्या आणि आपल्या अनुभवानुसार जा. एकदा एक अमेरिकन महिला सांगत होती तिच्या लग्नाला चाळीस वर्ष झालेत आणि ती एकाच माणसासोबत चाळीस वर्षापासून राहतेय. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झालेत ती कशी काय एकाच माणसासोबत चाळीस वर्ष राहू शकते.मग ती म्हणाली जर तुम्हाला माहित नसेल की बोट एका ओळीत कशी लावायची आणि जरी तुम्ही बोट बदलली तरी तुम्हाला माहित नाही कशी रांगेत लावायची तर काय कराल. मी त्यावर म्हंटले, "हि कथा भारतातल्या प्रत्येक घरातली आहे आणि हि प्रथा तिथल्या प्रत्येक गावातली आहे.'
जर तुम्हना बोट कशी लावायची हे माहित नसेल तर काही उपयोग नाही.
म्हणूनच, आपल्या अवती भवती कसेही लोक असले तरी आपल्याला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात आणि आपल्या प्रयत्नांनी इतरांमधील चांगले गुण जोपासायचे. दुसऱ्याची टीका केल्याने आपले कधी भले होत नाही. त्यापेक्षा दुसऱ्यान्चा  आधार बना.तुम्ही नुसते बसून जर टीकाच करीत राहाल तर संबंधांमध्ये अंतर येईल. तुम्ही त्यांना समजून घ्याला हवय, ते कुठून आलेत कुठे चुकतंय त्याचं. आणि त्यांना प्रेमाने सांगा कुठे चुकतंय आणि तुंना प्रेमाने जिंका. ह्या प्रक्रियेला वेळ लागेल, कुणाचीही टीका करणे आणि आपल्यापासून दूर ठेवणे सोपे आहे. हे काही मिनिटात शक्य आहे पण त्यांच्या सोबत दिवस रात्र राहणे त्यांना समजावणे त्यांच्यात बदल घडवणे हे कठीण पण महत्वाचे आहे. हे तेच आहे की काय केल्या गेल्या पाहिजे.

प्रश्न : गुरुजी, पूजा करताना जेव्हा देवाच्या मूर्तीला सजवल्या जाता ते बघताना खूप सुंदर वाटत, पण आपले डोळे बंद करून जेव्हा ध्यान करतो ते देखील सुंदर वाटत. मग, अशा वेळी काय करावा ध्यान करावा की बघाव?
श्री श्री रवि शंकर : ध्यानात तल्लीन होऊन जा आणि ती पूजा श्रेष्ठ तुज होय.पूजा म्हणजे काय? 'येन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहीनाद, संतोषां जानायेत्प्रग्यः तादेवेश्वारापुजानाम.'
कुठल्या पद्धतीची आराधना श्रेष्ठ? ज्या उपासनेने लोकांच्या मनाला सुख आणि शांती मिळेल ते श्रेष्ठ होय, सगळ्यांना आनंद मिळेल.'येन केन प्रकारेण ' हे पूर्वीच्या काळी म्हंटले जायचे. आता ते होणे शक्य नाही. खरा आनंद फक्त ध्यानाने मिळवता येईल.

प्रश्न : गुरुजी, देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईला सुरुवात झाली आहे. ह्या लढाईत तुम्ही राम, श्री रामदेवजी लक्ष्मण, आणि अन्न हजारेजी हनुमान आहे. पण राम अजून युद्ध भूमीत आले नाहीत अजून?

श्री श्री रवि शंकर : तुम्ही अरविंद (अरविंद केजरीवाल) यांह सोडलत. मी सगळ्यांमध्ये आहे आणि मी सगळ्यांसोबत आहे. अरविंद हा एक माध्यम आहे त्या लोकांचा जे भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत. बघा, भ्रष्टाचार हा समाजाच्या विविध स्तरावर उपस्थित आहे. प्रार्थमिक भ्रष्टाचाराची पटली हि लोकांच्या मनातली आहे आणि सगळ्यात पहिले ती दूर करायला हवी. आपण देवालाही लाच देतो, तू जर माझा हे काम केला तर मी तुला ते देईल, मी तुला नारळ अर्पण करेल, वैष्णव देवीला पदयात्रा करीत जाईल. लोक जी मागणी किंवा इच्चा करतात देवाकडे तो सुधा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. पण हे ठीक आहे एखादवेळी मनुष्य काही ना मागता देवाला अर्पण करतो हे चालत. तुम्ही देवाला काही देता ते द्या पण ते आपल्या गरजा पूर्ण करता देत असाल तर ते चुकीच आहे. ही प्रथा सगळ्याच धर्मांमध्ये चालते हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती , आणि बौद्ध. ही समज चुकीची आहे की माझी मनोकामना पूर्ण झाल्यावर मी हे देईल ते देईल. हे व्हायला नको. जर सामान्य जनता भ्रष्टाचाराविरुद्ध उभी राहिली आणि लाच दिली नाही तर कुणी कसे काय घेईल? तर सग्यात पहिले त्या लोनाकाना पकडल पाहिजे जे लाच देतात.त्यांना सांगा देऊ नका.आपल्याला अध्यात्माची लाट जागवायची गरज आहे. हेच कारण आहे की आपली आंतरिक शक्ती अजून वाढेल आणि लोक लाच द्यायला नाकारतील. तुम्ही जेव्हा परत जाल, तेव्हा तुम्चातल्या प्रत्येकाला कमीत कमी १०० लोकांना प्रतिज्ञा घ्यायला लावायची की ते कधीही कुणालाही लाच देणार नाही. तुम्ही कुणाला पैसे देऊ केलेत तर तू आपल्या बायको मुलांचा विचार करतो आणि त्याला वाटत की आपण हे पैसे घ्यायला पाहिजे तर हे अत्यंत महत्वाचे आहे की लोकांना लाच देण्यापासून थांबवावे.
दुसरे असे, लाच घेणे हे सरकारी पातळीवर पण होताहेत. बऱ्याच स्वयंसेवकांनी जागोजागी सरकारी कर्मचार्याच्या टेबलावर जाऊन "आम्ही लाच घेत नाही" अशी पट्टी चिकटविली आहे. हे इथे सुरु झले आहे पण बऱ्याच राज्यात सुरु व्याचे आहे. अजून महाराष्ट्रात हे सुरु नाही झाले; जिथे हे सुरु नाही झाले तिथे आपण स्वयंसेवकांनी कर्मचार्यांच्या टेबल जवळ जाऊन "आम्ही लाच घेत नाही" असे चिकटवायला हवे.तुम्ही जर जाल आणि चीक्तावळ तर कुठलाच कर्मचारी तुम्हाला अडवणार नाही; कुठे चिकटवा टेबलावर किंवा कुर्चीवर की इथे लाच घेतली जात नाही आणि जे लोक लाच देतात ते हे वाचल्यावर लाच देणार नाही.
अच्चा आता तिसऱ्या प्रकारचा भ्रष्टाचार हा मंत्र्यांच्या स्तरावर चालतो, त्यासाठी लोकपाल बिल मार्फत काम चाल्लय आणि अरविन्द्जी, अण्णाजी, स्वामीजी, किरण बेदी हे दिवस रात्र यासाठी काम करताहेत. जर लोकपाल, एकदा पास झला तर बरेच बदल घडतील. पण एका बिलाच्या भरोश्यावर काम भागणार नाही, समाजात या बिलाबद्दल जागरूकता आणण्याची गरज आहे, की ही काय आहे आणि कसे तुम्ही भ्रष्टाचाराशी संबंधित असाल तर कायद्याने तुम्हाला शिक्षा केली जाईल. आता या क्षणाला हे व्यायला हवे. अशाप्रकारे हे काम समाजाच्या सर्व पातळीवर व्यायला हवे आणि सर्वात महत्वाचे आहे लोकांची मानसिकता बदलणे आणि ते अध्यात्माच्या मदतीने शक्य होईल कारण जिथे आपलेपणा संपतो तिथेच भ्रष्टाचाराला सुरुवात होते. कुणीही आपल्या घरच्यांना किंवा आप्तस्वकीयांना लाच मागणार नाही. आणि याचा अर्थ असा आहे आध्यात्माद्वारे आपण लोकांमध्ये आपलेपणा जागृत करायलाच हवय. आपल्याला साग्यांमध्ये विश्वास जागवायला लागेल की जे तुमचा आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही मेहनत करा स्वयंभू बना आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. जे तुमच आहे ते तुम्ही कमवाल.अशा प्रकारे, लोकांमध्ये ही आंतरिक शक्ती आणि जागरूकता जागवण्याची गरज आहे, होय! ह्यासोबत आपल्या देशात मोठा बदल आणण्याची आवशकता आहे.
आता बघा, तमिळ नाडू मध्ये कीती भ्रष्टाचार होता, निवडणुकांपूर्वी, लोकांना त्यांच्या परिवार खातर पैसे देऊ केले जायचे आणि हे लोक मुलांखातर पैसे घ्यायचे आणि त्या मतदाराला निवडून द्यायचे. मी लोकांना विविध जिल्ह्यात पाठवून सांगितले की पैसे घ्या पण त्या लोकांना मत देऊ कारण ते तुमचेच पैसे तुम्हाला परत करताहेत. ते इतके गरीब लोक असतात की ते पैसे घेतात. मी त्यांना सांगितला पैस्याच्या बदल्यात मत देऊ नका आणि पापाची चिंता करू नका, सगळे पाप मला द्या, मी सगळे पाप आपल्यावर घेतो, काही समस्या नाही. आणि आम्ही तामिळ नादूत यशस्वी झालो.आणि सुदैवाने निवडणूक आयुक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी आपला पाठिंबा आणि संमती दिली.पण आपल्या पैकी प्रत्येकाल काम करायला हवाय. आपल्याला गावोगावी जाऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता आणायला हवी, आणि समाजाच्या विचारसरणीला आणि मानसिकतेला बदलायला हवंय.
प्रत्येक व्यक्तीला वाटायला हव कि आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन.इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आपल्याला सगळ्यांना प्रेमाने आलिंगन द्या आणि एकत्र पुढची वाटचाल करा.आपण असा म्हणायला नको की "फक्त माझाच मार्ग बरोबर आहे" नाही.भारताची एक सुन्देर्ता आहे की जरी इथे विविध प्रकारचे लोक, विश्वास, समुदाय आहेत आम्ही सर्वच सम्मान करतो सगळ्यांचा आदर करतो आणि समंजस पाने आम्ही पुढची वाटचाल कर

मन, मानसिकता आणि वेळ यांचे सुंदर शास्त्र

रश्न : गुरुजी, एका गुरूला निवडणे म्हणजे इतर महात्म्यांचे विचार न मानणे असे आहे का? आपल्याला एका पेक्षा अधिक गुरु असू शकतात का?
श्री श्री रवि शंकर: ओह! एका गुरूला सांभाळणे इतके अवघड आहे, तुम्ही कसे ......! (हशा) ते इतके सोपे नाही. सगळ्यांचा आदर करा पण एकच मार्ग धारा. सगळ्यांना मन द्या आणि तुम्ही पाहाल, सगळ्या महात्म्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे. फक्त एकच सत्य आहे, म्हणून, सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे, पण काळाच्या गरजेनुसार पद्धती वेगवेगळ्या आहेत.
या रस्त्यावर असताना मनात द्वंद्व ठेवू नका. ज्या रस्त्यावर असाल, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, आणि त्यामुळेच तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही त्या रस्त्यावर, त्या शिक्षकांची, त्या महात्म्यांची सेवा केली आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला येथपर्यंत घेऊन आले आहेत, आणि या धारणेने तुम्ही पुढे चला, ठीक आहे?
असे आहे की तुम्ही सगळेच करत बसलात तर, गोंधळात पडाल! तर, मी असे म्हणेन, की एकाला सगळ्यामध्ये बघा आणि सगळ्यांना एकामध्ये बघा.
सगळ्यांना मन द्या आणि एकच रस्ता निवडा.

प्रश्न : जर तुमचा गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्यावर नाराज असेल तर काय करावे?
श्री श्री रवि  शंकर: वेगाने प्रगती करा! गुरु तुमचा प्रगतीमुळे नाराज असतो. म्हणून, वेग वाढवा आणि प्रगती करा. जोरात पळा !

प्रश्न : गुरुजी, मानसिकता आणि वेळ यामध्ये काही संबंध आहे का? काही वेळा आपल्याला वेगवेगळ्या भावना का येतात, जसे की रात्री उदास वाटणे? 
श्री श्री रवि शंकर: हो, हो! वेळ आणि मन एकमेकांशी जोडलेले आहेत, हो! तुम्हाला हे माहिती पाहिजे. वेळ आणि मन हे समानार्थी आहेत. आठ गोष्टी आहेत: वैशेशिका, कानडा …सगळ्यांनी सांगितले आहे ' देश, काल, मनः' देश म्हणजे आकाश, काल म्हणजे वेळ आणि मनः म्हणजे मन. ही सगळी तत्व आहेत. आणि एकमेकांशी जोडलेली आहेत. देश आणि काल जोडलेले आहेत. आकाश आणि वेळ जोडलेले आहे. या पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे दुसऱ्यावरचे अनेक दिवस. चंद्रावर ही परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही, गुरु ग्रहावर असाल तर माणसाचे एक वर्ष म्हणजे तिथला एक महिना. जर तुम्हाला गुरु ग्रहावर १ वर्ष अनुभव घ्यायचा असेल तर माणसाची १२ वर्षे लागतील.
गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला १२ वर्षे लागतात. तसेच जर तुम्ही शनी ग्रहावर असाल, तर ३० वर्षांचे १ वर्ष!
अगदी तसेच पितरांचे, जे लोक वारले आहेत, आपले माणसांचे एक वर्ष म्हणजे त्यांचा १ दिवस. म्हणजे आपले सहा महिने म्हणजे एक रात्र आणि सहा महिने म्हणजे एक दिवस. तर, एका आत्म्यासाठी जे आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचासाठी एक पूर्ण वर्ष म्हणजे एक दिवस आहे. वेगवेगळ्या आयामांमध्ये इतके वेगवेगळे काळ आणि वेगवेगळे अवकाश आहेत. म्हणून, वेळ आणि अवकाश जोडलेले आहेत. त्याला वेळ-अवकाश कर्व्ह. तसेच तिसर्या आयमाचे आहे, म्हणजेच मनाचे! मनविरहित, अलौकिक चेतना म्हणजे महाकाळ, शिवा, चेतनेची चौथी स्थिती.
त्याला महाकाळ म्हणजे मोठा काळ आणि मन नसलेला. मन नसणे म्हणजे चांगला काळ.
तर, सकाळी ४.३० ते ६.३०, सूर्योदयाच्या थोडे आधी, पहाटेच्या आधीच्या वेळेला निर्मितीक्षम वेळ म्हणाले आहे.
ब्राह्म मुहूर्त! आणि नंतर प्रत्यक दोन तासांनी, त्याला लग्न; म्हणजे वेळेचे एकक. आणि हे एकक मनाची स्थिती दर्शवते. आणि परत हे चंद्राच्या, सूर्याच्या स्थितीशी जोडलेले आहे. इतके पहलु आहेत! १० वेगवेगळे पहलु मनावर परिणाम करत. तर, फक्त वेळच नाही तर दिवसाची गुणवत्ता पण मनावर परिणाम करते. प्रत्येक अडीच दिवसांनी मनाची अवस्था बदलते! मनाची मानसिकता! तर जर तुम्ही त्रासलेले असाल, तर ते पुढे जास्तीत जास्त अडीच दिवस चालू राहू शकते; अडीच दिवसच असे काही नाही. एका टोकापर्यंत ते वाढते आणि खाली येते. पण अडीच दिवसानंतर तुम्हाला त्याच भावना तेव्हड्याच तीव्रतेने असणार नाहीत.
अशक्य! त्या बदलतात. खूप बदलतात! मन, मानसिकता आणि वेळ यांचा संबंध असलेले शास्त्र खूप मोठे आहे.
ज्योतिष शास्त्रा याच्यावर  प्रकाश टाकू शकते. तुम्हाला भविष्य सांगणारे माहित आहेत, सामान्यपणे आठवड्याच्या स्तंभामध्ये ते सांगतात, ' ओह, नात्यांसाठी चांगले, पैसे मिळवण्यासाठी चांगले, हे आणि ते!' ते त्या गोष्टी लिहितात (हसतात)! ते त्या गोष्टीना सर्वसामान्य बनवतात, ' तुम्ही जर या वेळी जन्माला आले असाल तर तुमच्यासाठी हे चांगले आहे आणि तुम्ही हे करा.' यात काही शंकाच नाही, हे खूप सामान्य आहे आणि पैसे कमावण्यासाठी केलेली गोष्ट आहे. पण ही फसवा-फसवी नाही; त्यात सत्यही आहे. त्याचा पाया सत्य आहे. मन आणि काल जोडलेले आहेत हे तवा सत्य आहे.
मन म्हणजे मानसिकता, विचार, मते, कल्पना, सर्व गोष्टी ज्या आपण गोळा करतो. आणि, मन नसणे म्हणजे ध्यान. पाहत आणि संध्याकाळ हे ध्यानासाठी चांगली वेळ समजली जाते. तर, जेंव्हा तुम्ही ध्यान करता, किंवा जेंव्हा वाईट काळ असतो, तेंव्हा तुम्ही ध्यान करता. जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुम्ही मनाच्या प्रभावापासून मुक्त होता आणि स्वतःमध्ये जाता. स्वतः म्हणजे शिव तत्व.  शिव तत्व म्हणजे नेहमी उदार, काळजी घेणारे, प्रेमळ, वर न्हेणारे. तुमच्या आतील खोल चेतना की जी प्रेमळ, काळजी घेणारी, वर न्हेणारी आणि उदार आहे, ती मनाचे नकारात्मककाळाचे  परिणाम दूर करेल.
भारतामध्ये हा सामान्य विश्वास आहे, जेंव्हा वाईट काळ असेल तेंव्हा फक्त ओम  नमः शिवाय, असे म्हणा आणि ते निघून जाईल. तो सगळा वाईट काळ निघून जाईल.  ‘मनः’, जेंव्हा उलट बाजूने वाचले जाते, त्याचे नमः होते. मनः म्हणजे जेंव्हा चेतना जगाच्या बाहेर जाते, आणि नमः म्हणजे जेंव्हा चेतना आत जाते. शिवाय , शिव तत्वाकडे, चेतनेचा चौथा आयाम,  अस्तित्वाचा सूक्ष्मतम पहलु, शिव तत्व! नमः, म्हणजे मन निर्मितीच्या पायाभूत अवस्थेकडे जाते, तेंव्हा ते सर्वकाही अतिशय उदार अनुभवामध्ये बदलू शकते.

प्रश्न : तुमच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरे कशी असतात?
श्री श्री रवि शंकर: याचे उत्तर माझ्याकडे नाही!

जेंव्हा तुम्ही ध्यान करता तुमचे मन शांत होते, आणि ते शांत मन देवाचे घर असते.

प्रश्न : जय गुरुदेव, गुरुजी, मी मन, बुद्धी, स्मृती, अहंकार इ. मधून जगाला ओळखतो. पण या सहा पायऱ्या ओलांडल्यानंतरच मी मला स्वतःला ओळखू शकतो. तर माझा प्रश्न असा आहे की जेंव्हा आपण या सहा पायऱ्या ओलांडतो, त्यानंतर स्वतःला सातव्या पायरीवर कसे ठेवावे?
श्री श्री रवि शंकर:  आपल्याला या सहा पायऱ्या सोडायची गरज नाही; आपण शरीर, मन आणि बुद्धी सोडू शकत नाही. आपल्याला याबरोबर राहिलेच पाहिजे आणि स्वतःला ओळखले पाहिजे. शरीर, मन स्मृती आणि बुद्धी आहेत आणि त्यांना तिथेच राहू देत. तुमचे काम सुरु होण्याआधी आणि झाल्यानंतर रोज काही मिनिटे ध्यान करा आणि आराम करा. हे पहा, जेंव्हा तुम्ही ध्यान करता आणि तुमचे मन शांत होते, ते शांत मन देवाचे घर असते. म्हणूनच तुम्ही देवाला जणू शकत नाही पण देवाबरोबर एकरूप होऊ शकता. तुम्हाला शांत वाटत असेल, आनंदी वाटत असेल, तुम्ही तुमच्या आत जात असता. यात तुम्ही "मीच सगळे काही आहे, हे सर्व मीच आहे'.

प्रश्न : जय गुरुदेव. गुरुदेव. मी तुमची खूप सारी पुस्तके वाचली आहेत आणि सत्य साई बाबा आणि ओशोंची पण वाचली आहेत. मला त्यांच्यात काही फरक वाटला नाही, ते सर्व प्रेमाबद्दल बोलतात आणि मला वाटते की ते फक्त वेगवेगळी भौतिक रूपे आहेत. ओशोंचा झोर्बा द बुद्ध या संकल्पनेचा माझ्यावर खूप परिणाम आहे. मला तुमच्या त्याबद्दलच्या धारणा माहिती करून घ्यायच्या आहेत. ते ज्याप्रकारे भौतिक आणि अध्यात्मिक दोन्ही विषयांवर एकदम बोलले ते मला आवडले. तुम्हाला काय वाटते ते ऐकायचे आहे.
श्री श्री  रवि शंकर: हो, ते खूप मोठे वक्ते होते आणि ते खरच खूप चांगले बोलायचे. त्यांना एक खोल बौद्धिक अंतर्दृष्टी होती की जे चांगले आहे पण एक गोष्ट नव्हती ती म्हणजे मंत्रांचे ज्ञान; मंत्रांच्या रूढीचे ज्ञान. बुद्ध म्हणाले की हे काही नाहीये, सगळे नाही आहे आणि ते असेही म्हणाले की त्यांनी अंतिम गोष्टीचा शोध घेतला, मी स्वतःचा शोध घेतला पण मला असे लक्षात आले की स्व नाहीच. मी शोधले आणि खुप शोधले आणि असे लक्षात आले की आत्मा पण नाही.
पण सनातन धर्मामध्ये, आदि शंकराचार्य म्हणतात ‘कोणाचा शोध घेतला जातो? काय आहे की जे सापडले नाही?' ते नाण्याच्या दोन बाजुसारखे आहे. ते रिकामेपणाबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला वेदांत पूर्णत्वाबद्दल बोलते. ती एक पायरी आहे, कुणीतरी पासून कुणी नसणे ही एक पायरी आहे, आणि वेदांत तुम्हाला कुणीही नसल्यापासून कुणीतरी सगळ्यांकडे घेऊन जाते.

प्रश्न : प्रिय गुरुजी, असे म्हणतात की पुनर्जन्मातून आपले आत्मे परत परत वापरले जातात, तरी सुद्धा जगाची लोकसंख्या वाढत आहे. बाहेरच्या ग्रहावरील आत्मे पृथ्वीवर येऊन राहात आहे की इतर जीव मनुष्य जन्म घेत आहेत?
श्री श्री रवि शंकर: इतर जीव. दोन्ही शक्य आहे, दोन्ही गोष्टी घडत आहेत.

प्रश्न : गुरुजी , डॉ. स्टीफन हॉकिंग यांना यांना आताच्या मनुष्य जन्माबद्दल खूप विश्वास आहे. ते म्हणतात की या आयुष्याच्या पलीकडे काही नाही, या अस्तित्वाशिवाय दुसरे काही नाही. मला माहित नाही की धर्मांचा किती अभ्यास त्यांनी केला आहे पण मला माहित आहे की तुम्ही भौतिक शास्त्राचा अभ्यास केला आहे. तर तुम्ही त्यांना कसे उत्तर द्याल?
श्री श्री रवि  शंकर:  कोणीही शास्त्रज्ञ असे म्हणणार नाही की, ' मला सगळे काही माहित आहे आणि इथे जे काही आहे तेवढेच आहे आणि त्या पलीकडे काही नाही'. अजिबात नाही, स्टीफन हॉकिंग असे नाही म्हणाले की इथे आहेच तेच सर्वस्व आहे. ते म्हणाले की अनेक स्तर आणि आयाम आहेत. आपला मेंदू लहरी विश्लेषक आहे; तो काही विशिष्ट लहरींचे विश्लेषण करू शकतो. आत्ता या क्षणी अनेक इतर लहरी आहेत. त्यामुळे कोणीही शास्त्रज्ञ वेवेगळ्या स्तरांवरचे अस्तित्व, अनेक विश्व, यांचे असणे नाकारू शकत नाही, कारण अनेक तरंग आहेत. तुम्ही जे पाहता ते तरंगांचे काम आहे आणि त्यांत अनंत स्तर आहेत, एक आत आणि दुसरी त्याचा आत. मायक्रोसोम पासून म्याक्रोसोम पर्यंत, इतकी विश्व आहे आणि काळाचे वेगवेगळे स्तर.

प्रश्न : जय गुरुदेव. रामकृष्ण परमहंस हे मोठे साधक होते, त्यांनी आयुष्यभर साधना केली तरी आयुष्याच्या शेवटी त्यांना त्रास झाला, का?
श्री श्री रवि शंकर: कधी कधी, गुरु त्यांच्या शिष्यांचे कर्म घेतात. त्यांच्या शिष्यांच्या कर्मामुळे त्यांना शारीरिक आजारामधून जावे लागले. प्रत्येकानेच त्यातून जावे असे काही नाही, काही गुरु तसे करायला निवडतात, एवढेच!

प्रश्न : कधी कधी मी कामामुळे थकून जातो आणि स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो. मी स्वतःवर नियंत्रण कसे ठेवू कारण याचे परिणाम माझ्यासाठीच त्रासदायक असतात?
श्री श्री रवि शंकर: हो, म्हणूनच जेंव्हा तुम्ही थकून जाता, बस आणि ध्यान करा. प्राणायाम करा आणि ध्यान करा त्याने तुमचा थकवा निघून जाईल.

प्रश्न : प्रिय गुरुजी, मला एक लक्षात आले आहे की जेंव्हा कोणी तुम्हाला फुलांची माल घालतो ती पडते, असे का?
श्री श्री रवि शंकर: फुलांच्या माळांची काही गरज नाही, ती मी तुम्हाला परत देतो आहे.

प्रश्न : गुरुजी, असे म्हणतात की मृत्युच्या शेवटच्या क्षणी जो विचार किंवा जी स्मृती असते त्याचा परिणाम पुढच्या जन्मावर होतो. माझ्या मनात या भौतिक जगाचा खूप परिणाम आहे. या माझ्या मनात मृत्यूचा वेळी फक्त तुमचा आणि तुमचा विचार असावा यासाठी मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: त्यासाठी मृत्युच्या शेवटच्या क्षणाची वाट बघायची काही गरज नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि सेवा, साधना आणि सत्संग करा.

प्रश्न : आदरणीय गुरुजी, मला आपल्या देशाच्या अर्थशास्त्राबद्दल काळजी वाटते ज्यावर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम होत आहे. त्याच वेळी अणु उर्जा घटक आहे हे जपान च्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. आपला देश कसा पुढे जाईल?
श्री श्री रवि शंकर:  लोकांमध्ये त्याबद्दल विचार वाढवा. प्रत्येकाने आपल्या वातावरणाबद्दल सजग राहिले पाहिजे, लोकांसाठी, देशासाठी. जेंव्हा प्रत्येकाला ही काळजी वाटेल, तेंव्हा गोष्टी बदलतील.

प्रश्न : जय गुरुदेव. देव आहे का, त्यावर विश्वास कसा ठेवावा?
श्री श्री रवि शंकर: गाड्या पळत आहेत, तुम्ही त्यांना पाहता का? हो, पण त्यांना कोणी पळवत आहे की त्या आपला आप पळतात? त्यात चालक आहे, बरोबर, पण गाड्या पळताना तुम्हाला नेहमी चालक दिसत नाही, बरोबर?

प्रश्न: गुरुजी, प्रत्येकजण मोक्षाचा मागे पळत आहे. मोक्ष म्हणजे काय ते मला पण कृपया सांगा?
श्री श्री रवि शंकर: तू पण मोक्षाच्या मागे का धावत आहेस? तू जर पळत नाहीस तर मग अडचण काय आहे? जे पळत आहेत त्यांना मी सांगेन, तू त्याची काळजी करू नको.

प्रश्न : गुरुजी माझ्याकडे ३० एकर शेतीखालाची जमीन आहे जिथे शेवटी गुरुदेव दत्ताचे आणि साई बाबांचे एक छोटे देऊळ आहे, पश्चिम दिशेच्या जवळ दक्षिणोत्तर जागा आहे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे उतार आहे. माझ्या वास्तू तज्ञाने मला सांगितले आहे की अशी जमीन असणे धोकादायक आहे आणि ती काढून टाका. गुरुजी, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर:  हे पहा, ग्रहावर अशी जमीन आहे. प्रत्येक जागेत काही चांगले घडते आणि काही फार चांगले घडत नाही, काही फरक पडत नाही. 'ओम नमः शिवाय' चा किंवा 'गुरु ओम' चा जप करा आणि सर्व नकारात्मक परिणाम दूर होतील.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा नवरा माझावर नेहमी आरडा ओरडा करतो आणि मी साधारण आवाजात बोलले तरी मोठ्याने बोलतो. इतरांशी अतिशय मृदू बोलतो, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर: याचा अर्थ असा की तो इतरांपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो. त्याने तिथेच फरक केला आहे. इथेपर्यंत तुम्ही सांभाळले आहे; तुम्हाला माहिती आहे की कसे सांभाळावे, संभाळा. तो चांगले बोलेल याची अपेक्षा ठेवू नका, निदान तुम्ही चांगले बोला आणि त्याला कठोर राहू देत. ते एकतर्फी असेल, फरक पडत नाही, सामंजस्य राहील.

प्रश्न :गुरुजी, ज्ञानाचा मार्ग खूप अवघड आहे; समर्पणाने ज्ञान मिळू शकते का?
श्री श्री रवि शंकर: हो, नक्कीच.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी स्वतःची तुलना जगाबरोबर करणे कसे थांबवू?
श्री श्री रवि शंकर: तुमच्याकडे स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्याइतका वेळ आहे. अरे बापरे, मला वेळच नाही. तुमच्या हातात खूप वेळ आहे, तुम्ही काहीतरी जास्त निर्मितीक्षम करा. तुम्ही बसून स्वतःची जगाबरोबर तुलना करत आहात, वेळेचा केवढां  अपव्यय.

प्रश्न : गुरुजी, आपल्या शास्त्रात चार गोष्टी करा म्हणून सांगितल्या आहेत त्या म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आणि करू नये अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकार.  काम हा करावे आणि करू नये या दोन्हीत आहे, असा विरोधाभास का?
श्री श्री रवि शंकर:  हो, कारण ते अती करणे हे चूक आहे आणि योग्य प्रमाणत करणे चांगले आहे. जेवणातील मिठासारखे आहे, योग्य प्रमाणात मीठ चांगले असते आणि जास्त मीठ चांगले नसते.

प्रश्न : ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक ज्योतिषी वेगवेगळे खडे आणि अंगठ्या घालायला सांगतात. तुम्ही त्या घालायला सांगता का आणि जर तुम्ही अध्यात्मिक मार्गावर असाल तर या गोष्टी घालायची गरज आहे का?
श्री श्री रवि शंकर: नाही, काही गरज नाही, नक्कीच प्रत्येक गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर थोडाफार परिणाम होतो पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दगडाच्या एका तुकड्यापेक्षा नक्कीच शक्तिशाली आहात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा. नाहीतर 'ओम नमः शिवाय' चा जप करा, तो सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे की जो कुठल्याही ग्रहाचे वाईट परिणाम घालवू शकेल.

जग हे माणसांनी आणि चुकांनी भरले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा

प्रश्न : प्रिय गुरुजी, देवी कालीचे दर्शन देऊन विवेकानंदानी रामकृष्ण परमहंसाना आशीर्वाद दिला असे आम्ही वाचले आहे. लोकांना हाच अनुभव आजसुद्धा येऊ शकतो का?

श्री श्री रवि शंकर : याउलट आहे. रामकृष्णानी विवेकानंदाना आशीर्वाद दिला. खूप अनुभव घडले. ती फक्त एक शक्ती होती जिच्यामुळे संपूर्ण वातावरण बदलले. अध्यात्मिक शक्तीने नाते आणि मन बदलले.

प्रश्न :गुरुजी , एक माणूस एकापेक्षा जास्त बीज मंत्र एका आयुष्यात घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, काहीच अडचण नाही.

प्रश्न : गुरुजी , जेंव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण केले तेंव्हा तुम्हाला कोण आवडले?
श्री श्री रवि शंकर : देवत्व, आणि तेच अजूनही आवडत आहे, हो!

प्रश्न : माझ्या आयुष्याशी निगडीत निर्णयांबद्दल मी संभ्रमावस्थेत असतो. मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : संभ्रमावस्था चांगली आहे, तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही नेहमीच संभ्रमावस्थेत असता. याचा अर्थ असा की तुमची प्रगती होत आहे. ठराविक कल्पना मोडून जेंव्हा नवीन कल्पना येतात तेंव्हाच संभ्रमावस्था येते. पण ती तात्पुरती स्थिती असते. नवीन कल्पना येतात, तुम्ही त्याचबरोबर पुढे जाता आणि ते मोडल्यावर परत संभ्रमावस्था येते. तर तुम्ही पुढे जात आहात.

प्रश्न : मी अशा ठिकाणी राहतो जिथे मी बंदूक घेऊन फिरलो नाही तर मला मारून टाकतील, अशा जागी मी अहिंसक कसा राहू? मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : हिंसाचार म्हणजे स्व-सुरक्षा नाही आणि अहिन्साचार म्हणजे स्व-सुरक्षेचा अभाव असेही नाही. तुम्ही स्व-सुरक्षेसाठी तयार असले पाहिजे यात काही शंकाच नाही, पण तुमच्या मनात आणि हृदयात अहिंसा ठेवा. आणि मग तुम्हाला अहिंसा दिसेल, अशी अहिंसा की हिंसाचारी लोक सुद्धा हिंसाचार सोडून देतील.

मी जेंव्हा वॉशिंगटन डी. सी. मध्ये होतो, लोस एंजिलीस मध्ये होतो तेंव्हा हे माझ्याबरोबर इतक्या वेळा झालेले आहे. दोन्ही ठिकाणी एक सभ्य पुरुषाला माझ्यावर हल्ला करायचा होता. त्याने मला येशूच्या नावाने शाप दिले आणि म्हणाला की हे सगळे पैशाचिक आहे, योग पैशाचिक आहे. हा उंच जाड्या माणूस जसा पुढे आला, मी म्हणालो " थांब". आमच्याकडे कुठलीही हत्यारे नव्हती आणि सुरक्षा व्यवस्था पण नव्हती. तो त्याच्या गुढग्यांवर बसला आणि रडायला लागला. सगळ्यांना इतके आश्चर्य वाटले, तो सत्संग होता, अशाप्रकारे कोणी हल्ला करेल असे कोणालाही वाटले नव्हते. मी फक्त म्हणालो, "थांब, थांब', आणि तो वाकला आणि त्याने रडायला सुरुवात केली. नंतर त्याने शिबीर केले.
तुम्हाला माहिती आहे, गैरसमजुतींमुळे हिंसा होवू शकते. ताण आणि अत्याचारांमुळे हिंसा होवू शकते. पण जेंव्हा आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवतो आणि हृदयातील शक्तीबरोबर चालतो तेंव्हा तुम्हाला मोठा फरक दिसेल. अशा कितीतरी घटना आहेत.

खूप पूर्वी मी दिल्ली आणि नोयडा मध्ये होतो. हजार लोक मशाली घेऊन माझी गाडी जाळायला आले होते. मी फक्त माझा हात दाखवला आणि म्हणालो, "थांबा, तुम्हाला काय हवे ते करा फक्त १० मिनिटे मला बोलू द्यात. पण तेंव्हाच, त्या १० मिनिटात ते सर्व बदलले. त्या दिवसात, १९८० मध्ये, नोयडा इतका प्रगत नव्हता, ते सर्व जंगल होते, चोर - लुटारूंचे खेडे. म्हणून आपण अहिंसेमध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि मी असे म्हणत नाही की तुम्ही हत्यार वापरू नका किंवा स्व-सुरक्षा शिकू नका. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे अहिंसेमध्ये मुरत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टींचा आधार घेऊ शकता, तुम्ही स्व सुरक्षेसाठी साधणे बाळगू शकता.

प्रश्न : मी माझी एक खूप चांगली नोकरी सोडली कारण तेथे खूप इर्षा धोका देण्याचे प्रकार होते. अशा नकारात्मक लोकांबरोबर कसे काम करावे?
श्री श्री रवि शंकर : कौशल्याने. नकारात्मक लोकांमुळे तुमच्यामधील अनेक कौशल्ये बाहेर येतात. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी तुम्हाला त्यांचाबरोबर कसे वागायचे ते शिकवले, त्या सर्व परिस्थितींमधून कसे बाहेर पडायचे आणि आणि पुढे जायचे हे त्यांचामुळे तुम्ही शिकला. आणि ते तुमची सर्व बटणे दाबातील आणि तुम्ही त्या बटण पासून मुक्त व्हाल.

प्रश्न : गुरुजी,खूप वेळा मला वाईट स्वप्ने पडतात. मी त्यापासून कशी सुटका करून घेऊ?
श्री श्री रवि शंकर : ध्यान करा, झोपी जायच्या आधी पण ध्यान करा आणि काही चांगले मंत्र ऐका, त्याने मदत होईल.

प्रश्न : गुरुजी, माझे आयुष्य अनेक वर्षांपासून अडीअडचणीने भरलेले आहे कि मला आता सगळे सोडून द्यावेसे वाटते. माझे वडील म्हणतात कि कोणीतरी आमच्या कुटुंबावर जादू टोणा केला आहे. जादू टोण्यासारख्या गोष्टी आहेत का आणि त्यातून मी कसा बाहेर पडू?
श्री श्री रवी शंकर: साधना, सेवा आणि सत्संग करा, काळी जादू तुम्हाला शिवू पण शकणार नाही. मंत्र म्हणा, वेदिक मंत्रोच्चार करा, रुद्र, ओम नमः शिवाय चा जप. या सगळ्याची मदत होईल.

प्रश्न : मी जेंव्हा यु. एस. मध्ये असतो तेंव्हा मला भारतात यायचे असते आणि मी जेंव्हा भारतात असतो तेंव्हा मला यु. एस. ची आठवण येते, मी काय करू?
श्री श्री रवि शंकर : बर, आत्ता जे करत आहात तेच करा, याची आठवण येऊ दे त्याची आठवण येऊ देत पण तुमचे ध्यान विसरू नका, साधना, सेवा आणि सत्संग विसरू नका. ते सगळीकडेच असेल.

प्रश्न : गुरुजी, महाभारतामध्ये कृष्णाने कौरव आणि पांडव दोघांना पाठींबा दिला. त्याने पांडवांच्या बाजूने शस्त्र का उचलले नाही जेंव्हा की त्याने पूर्ण सेना कौरवांच्या बाजूने पाठवली होती?
श्री श्री रवि शंकर : कृष्णाचे स्वतःचे मार्ग होते, अत्यंत गुड, तुम्ही समजू शकणार नाही. सोडून द्या. ज्याने कृष्णाला समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना समजले नाही, वेगवेगळे लोक, वेगवेगळे गट कृष्णामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात. म्हणूनच त्याला पूर्णावतार म्हणतात, तो प्रत्येक बाजूने पूर्ण आहे. एकमेवच.

प्रश्न : गुरुजी, ध्यानामुळे दृष्टीकोन बदलतो हे तर सरळच आहे, ध्यानामुळे कौशल्य पण वाढते का?
श्री श्री रवि शंकर : हो, नक्कीच

प्रश्न : गुरुजी , भाव समाधी बद्दल सांगू शकता का. आम्ही त्याचा अनुभव घेऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर : हो, भाव समाधी. बसा आणि संगीतामध्ये, भावनेमध्ये, भावामध्ये पूर्णपणे विरघळून जा. जेंव्हा मन स्थिर आणि शांत असते, तेंव्हा त्या क्षणी तुम्हाला नृत्य करावे असे वाटते. विचार आणि चिंता समाप्त होतात.

प्रश्न : मला माझे आई-वडील आणि माझे प्रेम यातील निवड का करावी लागते आहे?
श्री श्री रवि शंकर : अवघड प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, “ माझ्या आई-वडिलांना आवडत नाही अशा व्यक्तीला मी का निवडू किंवा माझे आई वडिलांना मी निवडलेली व्यक्ती का आवडत नाही?" तारेवरच्या कसरतीसारखे आहे, बरोबर?

प्रश्न : भक्ताचे देवावरचे प्रेम कमी होऊ शकते का आणि जर कमी झाले तर ते बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रवि शंकर : वेळ जाईल तसे ते बरोबर होईल.

प्रश्न : भावना, शरीर, मन आणि राग यांचे काय काम आहे?
श्री श्री रवि शंकर : तुमचे शरीर स्वस्थ ठेवा आणि भावना सकारात्मक ठेवा. खूप सोपे आहे. हे असे विचारण्यासारखे आहे की " मी माझा शर्ट कुठे ठेवू आणि प्यांट कुठे ठेवू?" तुमचा शर्ट वर ठेवा आणि प्यांट खाली. दुसरी पद्धतच नाही. प्रत्येकाची आप-आपली जागा आहे: अहंकाराची आपली जागा, भावनेची आपली जागा, आपले शरीर स्वस्थ आणि ताकदवान पाहिजे. निसर्गाच्या नियमांचा आदर केला पाहिजे, ठीक आहे?

प्रश्न : जेंव्हा अनेक रस्ते असतात तेंव्हा मी निवडलेला रस्ता बरोबर आहे हे कसे ओळखावे?
श्री श्री रवि शंकर : जेंव्हा शंका येतात, तेंव्हा खात्री बाळगा की तो योग्य रस्ता आहे. बऱ्याच वेळा, जेंव्हा खरे असते तेंव्हाच शंका येते. आपण ज्याची शंका घेतो, ते सगळे चांगले आहे. जर कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही आनंदी आहात का तर तुम्ही म्हणाल, "मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत". पण तुम्हाला तुमच्या दु:खाबद्दल पूर्ण खात्री असते, बरोबर? त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणी सांगितले की त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही म्हणाल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले, " मी तुझा द्वेष करतो",तर तुम्ही कधीही विचारात नाही की " खरच?"
बऱ्याच वेळा, आपल्या शंका चांगल्या गोष्टींसाठी असतात. जेंव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या मार्गावर असता, मार्ग चांगला की वाईट ही शंका येणारच.

प्रश्न : विश्वासघात कसा विसरावा? कुणीतरी माझा फार पूर्वी विश्वासघात केला आणि तो माणूस सारखा माझ्या मनात येत राहतो. योग, प्राणायाम, ध्यान केल्यानंतर ते विचार कधीतरी येतात. आधी सारखे सारखे यायचे. ते विचार संपूर्णपणे कसे काढून टाकावे?
श्री श्री रवि शंकर : ते आधीच कमी झाले आहे, हो की नाही? आतापर्यंत किती कमी झाले आहे? कधीतरी ते विचार येतात, बरोबर? मग काय? त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही ते जितके टाळाल, ते परत येत राहील. ते स्वीकारा, हा आयुष्यातला अनुभव आहे.

प्रश्न : असे म्हणतात की एखादी गोष्ट करून करून, अभ्यास करून माणूस परिपूर्ण होतो, पण परिपूर्ण कोणीच नसते, मग अभ्यास का करावा?
श्री श्री रवि शंकर : अभ्यास का करावा? कारण तसेही कोणी परिपूर्ण नाही. हो.
तुम्ही जेवता, आणि मग पोट रिकामे होते आणि परत, तुम्ही खाता आणि परत पोट रिकामे होते आणि तुम्ही परत खाता. मग, कशाला खायचे? पोट जर सारखे रिकामेच होणार असेल तर खायची काहीही गरज नाही.

प्रश्न : गुरुजी, कोणी जर एकसारखे खोटे बोलत असेल आणि सारखे दुसरी संधी मागत असेल तर काय करावे?
श्री श्री रवि शंकर : जर कोणी एकसारखे खोटे बोलत असेल तर काय करावे?
कोणीतरी मला काळ एक प्रश्न विचारला, " गुरुजी, तुम्ही माझावर रागावला आहात का?" मी म्हणालो, "नाही". याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझाशी नेहमी खोटे बोलत राहाल. आता, मला माहित आहे की काही लोक वाईट गोष्टी करतात, चुकीच्या गोष्टी बोलतात आणि इतरांच्या विश्वासाचा दुरुपयोग करतात. ते म्हणतात, " मी आताच गुरुजींशी फोन वर बोललो आणि ते असे असे म्हणाले."
मी माफ करतो आणि रागावत पण नाही पण मला त्यांची दया येते कारण ते त्यांचा डोक्यावर चिखल टाकत असतात. ते त्यांनाच त्रासदायक ठरत असतात. मग अशा लोकांवर रागावून मी माझे मन का खराब करावे? मला राग येत नाही पण दया येते कारण ते इथे तिथे जाऊन लोकांना त्रास देत असतात.

पिताजींनी एक वाक्य लिहिले आहे, " हे जग माणसांनी  आणि चुकांनी भरलेले आहे. चुकांना माफ करा आणि लोकांवर प्रेम करा." किती छान गोष्ट सांगितली आहे!

जीवन साथी

प्रश्न : गुरुजी, माझ्यामध्ये एक वर्षाचा संकल्प घेण्याची क्षमता नाही. मी काय करू?

श्री श्री रवि शंकर : क्षमता नाही? एक एक दिवसाच्या संकल्पाने सुरुवात करा. एक दिवसाचा जरी संकल्प करू शकलात तरी ते पुरेसे आहे. तुम्ही रोज असे करा. असा विचार नका करू की, "अरे देवा, मला आता एक वर्ष भर हे करायचे आहे.’ आज मी करत आहे– हे चांगले आहे. उद्या करेन - हे चांगले आहे.


प्रश्न : प्रिय गुरुजी, मी खूप प्रार्थना केली होती की या आठवड्यात तुम्ही इथे यावे. तुम्ही इथे आलात यासाठी मी आभारी आहे. प्रार्थनेबद्दल काही सांगा.
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्हाला खूप आभारी वाटत असते किंवा लाचार वाटत असते, तिथे प्रार्थनेचा जन्म होतो. प्रार्थनेचा उदय होण्याचे तिसरे कारण असे आहे की जेंव्हा तुम्ही ज्ञानात स्थित होता. तेंव्हा तुम्हाला दिसते की चेतनेचा विस्तार झाला आहे, चेतनेच्या एका नव्या आयामात तुम्ही पोचला आहात, की जो पूर्ण आहे, अंतर्ज्ञान, ज्ञान आणि प्रेमाने भरलेला आहे.



प्रश्न : कृपया नात्यांबद्दल सांगा. बऱ्याच वेळा ती इतकी अवघड का होतात?
श्री श्री रवि शंकर :
तुम्हाला परत एकदा ‘Celebrating Love’ हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्हाला की वाटते की नात्यांमध्ये अडचणी का येतात?



प्रश्न : मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. उलट जेंव्हा मी माझ्या भावना लपवतो तेंव्हा मला ताण येतो. मला कळत नाही की या परिस्थितीतून मी कसा बाहेर पडू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान करून सुद्धा मनाला रिकामे करणे अवघड आहे का?
श्री श्री रवि शंकर :
जर तुमच्या डोक्यात खूप विचार येत असतील, तर त्यामागे काही करणे आहेत. एक कारण तर असे आहे की पोट साफ नसणे, पोटाला तडस लागणे, असे असेल तर मनात खूप विचार येतात. जर शरीरात रक्त प्रवाह नीट नसेल तरी पण खूप विचार येतात.  हो की नाई? तर, योगासन आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मदत मिळेल. योग्य आहार केल्याने मदत मिळेल. आयुर्वेदिक डौक्टरना दाखवा. तो सांगेल, जर शरीरात पित्त जास्त झाले असेल तर त्यानुसार योग्य जेवण केल्याने मदत मिळेल.



प्रश्न : ज्या लोकांमध्ये आक्रमकता, ईर्ष्या आणि असंतुलन  अशा नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांबरोबर काम कसे करायचे?
श्री श्री रवि शंकर :
कौशल्याने. त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देताना कारुण्याचा उपयोग करा आणि बघा की तुम्ही त्यांच्या बरोबर कसे काम करू शकता. हां? यातून पहिली गोष्ट अशी होईल की तुमचे कौशल्य वाढेल. दुसरी गोष्ट अशी की धैर्य वाढेल. तीसरी गोष्ट अशी की तुम्हाला कळेल की ती व्यक्ती नेहमी ईर्ष्यापूर्ण किंवा रागात नसतो. तो पण बदलतो. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की लोक कसे बदलतात.



प्रश्न : लहान मुलांसारखे होणे आणि जबाबदारी घेणे यात काय साम्य आहे?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जबाबदारी घेता ही एक गोष्ट झाली. लहान मुलासारखे होण्याने जबाबदारी घेण्याला काही फरक पडत नाही. उलट यामुळे जबाबदारी घेण्याला मदत मिळते.



लहान मुलासारखे होणे आणि लहान मूल होणे यात फरक काय आहे? लहान मूल झाल्यावर तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही. लहान मुलासारखे होऊन जबाबदारी घेता तेंव्हा तुम्ही नैसर्गिक राहता, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून घेता, सगळ्यांकडून प्रतिक्रिया मागता, आणि जर कुठली प्रतिकूल प्रतिक्रिया असेल तर तुम्ही त्यामुळे चिंतेत पडत नाही, त्याचा सामना करता. जर ते योग्य असेल तर त्याचा स्वीकार करा, जर निरर्थक असेल तर स्वतःचा तोल न ढळू देता त्याकडे दुर्लक्ष करा.


प्रश्न : आपण आपल्या ग्रहासाठी काम करणे किती आवश्यक आहे?आपण की करू शकतो? आपण हे सगळे कसे टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: आपल्याला या गोष्टींबद्दल जागरूक राहायला लागेल की हा ग्रह म्हणजे आपले घर आहे. जेंव्हा आपण वरून पाहतो तेंव्हा आपल्याला देशांच्या सीमा दिसत नाहीत. सीमा रेषा या आपल्या समजुतीच्या सीमा रेषा आहेत, आपला भ्रम आहे. खरे तर कुठलीच सीमा रेषा नाही. आकाशाला सीमा रेषा माहित नाहीत. ढगांना पण या सीमा कळत नाहीत. हवेला कुठलीही सीमा नाही. या पृथ्वीचे पाचही तत्व सीमा रेषा मनात नाहीत. हा ग्रह सगळ्यांचेच घर आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत, यासाठी आपल्याला बृहद दृष्टिकोण ठेवायला पाहिजे. योग्य दृष्टिकोण काय आहे? तर हा पूर्ण ग्रह आपले घर आहे.



आपण आपला परमाणु कचरा इथे तिथे फेकू शकत नाही. जगात कुठेही ती जागा असो, परत आपल्याकडेच ते पोचेल! आपण कुठलीही एक जागा सीमाबद्ध करून साफ नाही ठेवू शकत. हे शक्य नाही. आपल्याला पूर्ण ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला पूर्ण जगाला जैविक शेतीकडे घेऊन गेले पाहिजे. जेंव्हा जेवण किंवा पीक पिकवण्याची वेळ येते तेंव्हा आपण हे नाही सांगू शकत की ' ठीक आहे, मी केवळ इथेच जैविक शेती करेन, बाकी जगात प्रदूषण होऊ देत!' कारण हवेतून सगळीकडे प्रदूषण पोचणार आहे! आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करून खूप व्हायरसना जन्म दिला आहे. आपण पृथ्वीवरचे कित्येक जीव नष्ट केले आहेत. आपण पृथ्वीची काळजी नाही केली, की ज्यामुळे अन्नाचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. येणाऱ्या पिढ्यांना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


मला असे वाटते की या ग्रहावर प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याची, पृथ्वी टिकवून ठेवायची आणि तिचा विकास करायची, जलाशय तसेच पाण्याचे रक्षण करणे व जास्तीत जास्त झाडे लावणे याची जबाबदारी घ्यायला लागेल. हे खूप आवश्यक आहे!


जगाची अजून एक मोठी समस्या आहे ती महणजे पाण्याची कमतरता. लाखो लोक उपासमारीच्या टोकावर आहेत. आपल्याला पूर्ण जगाकडे लक्ष ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. हां, आपल्याला आपले घर, आपला शेजार पाजार, जिथे आपण राहतो तिथली काळजी तर घेतलीच पाहिजे. हे सगळ्यात जास्त जरुरी आहे, पण त्याच बरोबर ही पण काळजी घेतली पाहिजे की या ग्रहावरचा प्रत्येकजन या कुटुंबाचा एक भाग आहे.


प्रश्न : हे शक्य आहे का की आपण प्रेम पण करावे आणि आतूनही मजबूत राहू, प्रेम पण करू आणि तर्कसंगत पण राहू, प्रेम करूनही वैराग्यात पण राहू, प्रेम भी करूनही ईर्ष्या आणि परिग्रह यापासून दूर राहू?
श्री श्री रवि शंकर : नक्कीच. जर ज्ञान असेल तर हे शक्य आहे की तुम्ही प्रेम पण करू शकाल आणि या नकारात्मक भावनांपासून दूर राहाल. भावनांपासुन दूर राहाल. ज्ञानाबरोबर प्रेम असणे आनंददायक आहे. जर प्रेमाबरोबर ज्ञान नसेल तर तुम्ही सांगितले ते सर्व होते – ईर्ष्या, लालच, इत्यादि।


प्रश्न : प्रिय गुरुजी, आपण मला मार्गदर्शन कराल का - मी ज्या व्यक्तीवर एक वर्षापासून प्रेम करते ती व्यक्ती माझासाठी योग्य आहे का?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जेंव्हा एखाद्यावर गाढ प्रेम करता तेंव्हा ती व्यक्ती तेव्हाद्यापुरती ठीक असेल. पण भविष्यातही ठीक असेल हे कोणी सांगू शकत नाही. हे तुमच्यावर आहे की ती परिस्थिती तुम्ही कशी संभाळाल. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर आधी हे माहिती करून घ्या की की तीव्याक्ती पण तुमच्यावर प्रेम करते की नाही. जर ती व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करत असेल तर दोघांनी मिळून ज्ञानात राहून पहा की हे प्रेम टिकवून कसे ठेवायचे– पुढे कसे जाल, कसे वागला, इत्यादी, ठीक आहे!



प्रेमाची सुरुवात खूप सरळ असते, पण खूप लोक हे प्रेम टिकवून ठेवू शकत नाहीत.
जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल आणि जर तुम्हाला त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करता आला नाही, त्याला वाढवता आले नाही तर तुम्ही ते घालवून बसता. ‘Celebrating Love’ या पुस्तकात मी त्या कौशल्याबद्दल सांगितले आहे, की ज्यामुळे तुम्ही प्रेम टिकवून ठेऊ शकता.